मुंबई महानगरपालिका लिपिक पद भरतीतील जाचक अटी कायम..
BMC प्रशासनाने उमेदवारांकडून बारावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मागितले आहे. मात्र, अर्ज करणारे अनेक उमेदवारांची अशी अपेक्षा आहे की या अटी रद्द कराव्या. मात्र, ही अट कायम ठेवण्याचा निर्णय BMC प्रशासनाने घेतला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) लिपिक पदासाठी (Clerk Recruitment) मोठी भरती सुरू असून प्रशासनाने यासाठीच्या जाचक अटी अद्याप शिथिल (The oppressive conditions are still not relaxed) केलेल्या नाहीत. इयत्ता बारावी व पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याची अट काढून टाकण्याची मागणी (Request for Cancellation of Terms) करण्यात आली होती. प्रशासनाने उमेदवारांकडून बारावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मागितले आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्जच स्वीकारला जात नसल्याने अनेकजण वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. अर्ज करणारे अनेक उमेदवारांची अशी अपेक्षा आहे की या अटी रद्द कराव्या. मात्र, ही अट कायम ठेवण्याचा निर्णय BMC प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू आहे. या पदभरतीच्या पात्रता अटींवर उमेदवारांनी व विविध कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरली जात आहेत. या जागांसाठी २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येणार आहे. मात्र, या पदासाठीच्या पात्रतेच्या अटी जाचक असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. जाचक अटींमुळे अनेक उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत या अटी रद्द कराव्या, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र प्रशासनाने या अटी तशाच ठेवल्या आहेत.
या परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरीता उमेदवार बारावी आणि पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. तसेच पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अर्ज भरतानाच सादर करावे लागत असल्यामुळे अनेक उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जात नसल्याची माहिती उमेदवार देत आहेत.