अकोला जिल्ह्यातील शाळकरी मुलांचा खाजगी वाहनांतून जिवघेना प्रवास, वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालूका परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंतचा जिवघेना प्रवास करावा लागत आहेत आहे. एरवी वाहतूकीचे नियम सांगणारे वाहतूक पोलिस मात्र या प्रकरणात झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहे. एखादा विद्यार्थी असा जीवघेना प्रवास करताना पडला आणि काही अनपेक्षित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

अकोला जिल्ह्यातील शाळकरी मुलांचा खाजगी वाहनांतून जिवघेना प्रवास, वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालूका परिसरातील (Murtizapur taluka illegal transport) शाळकरी विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंतचा जिवघेना प्रवास करावा लागत आहेत आहे. एरवी वाहतूकीचे नियम (Traffic rules) सांगणारे वाहतूक पोलिस (Traffic police) मात्र या प्रकरणात झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहे. एखादा विद्यार्थी असा जीवघेना प्रवास (Illegal transportation of school students) करताना पडला आणि काही अनपेक्षित घटना (Unexpected events) घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांच्या जीवाशी नेमकं कोण खेळतंय, असा सवाल उपस्थित होतोय. 

मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी, धोत्रा, अंभोरा, लाखपुरी, गोरेगाव, सालतवाडा, हातगाव, आदी भागातून दररोज खाजगी इंग्लिश शाळेकरिता हजारो विद्यार्थ्यांची खासजी वाहनातून वाहतूक करतात. विशेष म्हणजे  या वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची अवैद्य वाहतूक केल्या जाते, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी गाडीत भरून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गाने शाळेच्या वेळेपूर्वी पोहचण्याच्या नादात चालक सुसाट वेगाने वाहन पळवतात. यामुळं एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यावर वाहतूक पोलीस अथवा परिवहन विभागाचे अधिकारी (RTO) जागे होणार आहेत का? असा देखील प्रश्न विचारला जातोय. वाहतूक पोलिसांना या खाजगी वाहन चालकांकडून हप्ते दिले जातात, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.  

शाळकरी मुलांना शासनाकडून शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करून दिल्याचा सरकारकडून दिंडोरा पिटवला जातो. तर एस.टी. महामंडळाकडूनही शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बसेस सोडल्याचं सांगण्यात येत. मात्र बसेसच्या कमतरतेंमुळे शाळकरी मुलांना बसेस उपलब्ध होत नाहीत. यामुळं शाळेच्या वेळेत पोहोजण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांची आसरा घ्यावा लागत आहे. तसंच आपला जीव धोक्यात घालावा लागतो. हे कायमस्वरूपी कुठेतरी थांबायला हवं, अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गाकडून केली जातेय. त्यामुळे वाहतूक पोलिस याकडे लक्ष देणार का? आणि खाजगी वाहनधारकांना चाप बसणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

_______________________________________________________________

जे खाजगी वाहन धारक वाहतून नियमांचे उल्लांघन करत आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करत आहोत. त्याचबरोबर त्यांना प्रबोधन देखील करण्यात येत आहे. अवैध वाहतूकीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा घटना निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. 

- अजित जाधव, पोलिस निरिक्षक