रखडलेल्या प्राध्यापक भरतीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
एमपीएससीमार्फत भरती केल्यास पुढील अनेक वर्षे पूर्ण पदभरती होण्याची शक्यता नाही. यामुळे शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या मुख्य कारणामुळे प्राध्यापकांची भरती ही एमपीएससीऐवजी विद्यापीठ स्तरावरच करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
एज्युवार्ता
राज्य शासन सर्व विद्यापीठांमधील प्राध्यापकांची भरती (Universities and colleges professor recruitment) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्याच्या विचारात होते. मात्र, एमपीएससीमार्फत भरती केल्यास पुढील अनेक वर्षे पूर्ण पदभरती होण्याची शक्यता नाही. यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयांतील शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या मुख्य कारणामुळे प्राध्यापकांची भरती ही एमपीएससीऐवजी विद्यापीठ स्तरावरच (Professor recruitment will be done through the university) करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यापीठ पातळीवर रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांच मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत खात्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील १५ विद्यापीठांमध्ये ६५९ जागा रिक्त आहेत. त्यात मुंबई विद्यापीठामध्ये जवळपास १३६ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्यास नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅकिंग फ्रेमवर्कच्या क्रमवारीत व गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे विद्यापीठांमधील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. त्याला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर मार्च २०२५ पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शिक्षण सेट परीक्षेची तारीख जाहीर; मे महिन्यात या तारखेला होणार परीक्षा
प्राध्यापकांची भरती ही एमपीएससीच्या माध्यमातून करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. बिहार व झारखंड या राज्यांमध्ये अशाप्रकारे प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे. मात्र, सध्या एमपीएससीकडे भरतीसंदर्भातील अनेक परीक्षा प्रलंबित आहेत. त्यामुळे प्राध्यापकांची भरती सुद्धा एमपीएससीमार्फत केल्यास त्याचा परिणाम भरती प्रक्रिया विलंबाने होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅकिंग फ्रेमवर्कच्या क्रमवारीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया एमपीएससीऐवजी थेट विद्यापीठांतर्गतच करण्यात यावी, यासाठी राज्यपालांची दोन दिवसांत भेट घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.