जेईई मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये या वर्षांपासून बदल
'कोविड काळात प्रश्नांचे पर्यायी स्वरूप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अंतर्गत विभाग बी मध्ये प्रत्येक विषयासाठी फक्त 5 (पाच) प्रश्न असतील आणि उमेदवारांना पाचही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
NTA ने अधिकृत वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली आहे. एजन्सीने पुढे सांगितले आहे की, 'कोविड काळात प्रश्नांचे पर्यायी स्वरूप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अंतर्गत विभाग बी मध्ये प्रत्येक विषयासाठी फक्त 5 (पाच) प्रश्न असतील आणि उमेदवारांना पाचही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. NTA ने आपल्या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, 'JEE Main साठी जारी केलेल्या माहिती बुलेटिनमध्ये त्याचे तपशील दिले जातील, जे उमेदवारांना परीक्षेची पद्धत समजून घेण्यास मदत करेल.'