'एवढी' विद्यार्थी संख्या नसेल तर महाविद्यालये बंद होणार; 'या' विद्यापीठाचा मोठा निर्णय
या व्यतिरिक्त ज्या महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तरच्या विषयांना पुरेसे विद्यार्थी नसतील तर असे विषय देखील बंद करण्यात येणार आहे.
एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क
शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेमार्फत (Vidya Parishad of Shivaji University) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महाविद्यायात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. मात्र, त्या महाविद्यालयात (Postgraduate centers in colleges) क्षमतेपेक्षा २५ टक्के विद्यार्थी संख्या नसेल अशा महाविद्यालयांना पदव्युत्तर केंद्रे बंद करण्याची नोटीस (Notice of closure of postgraduate centers) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठाने तिन्ही जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे विद्यापीठ अधिविभागातील विद्यार्थ्यांची संख्या देखील घटल्याचे दिसून आले आहे. अधिविभागांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्याने आता विद्यापीठाने महाविद्यालय स्तरावरची पदव्युत्तर केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या व्यतिरिक्त ज्या महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तरच्या विषयांना पुरेसे विद्यार्थी नसतील तर असे विषय देखील बंद करण्यात येणार आहे. अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून काही शिक्षण संस्थापकांनी केली होती. अनेक महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासाबरोबर कौशल्याधिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी देखील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे.
ही पार्श्वभूमी लक्षात घेता, विद्यार्थी संख्या कमी असलेल्या विषयांना बंद करण्याचे प्रस्ताव काही महाविद्यालयांनी पाठवले आहेत. महाविद्यालयाच्या प्रस्तावाला मान्यता देत विषय बंद करण्याचा निर्णय विद्या परिषदेने घेतला.
सांगलीतील एका महाविद्यालयातील एम.फिल. बॉटनी, फिजिक्स तर कराड येथील एका महाविद्यालयातील एम. टेक. अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहे.
याशिवाय बी.ए.स्पोर्ट, बीए फिल्म मेकिंग विषयांना शिकत असताना सहा महिन्यांचे ट्रेनिंग देण्यास मान्यता देण्यात आली. बी. टेक. फुड टेक्नॉलॉजीची 3 संख्या घटत असल्याने ६० पटसंख्या आता ३० करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३५ ठरावांपैकी २५ ठराव मंजूर करण्यात आले.