पोलीस भरती चाचणी दरम्यान मैदानावरच मृत्यू; खाकी वर्दीचं स्वप्न अपुरंच राहिलं..
मुंबई येथे एसआरपीएफ भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत्यू पावलेला 27 वर्षीय तरूण तुषार भालके संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई येथे एसआरपीएफ भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात एका तरूणाचा मृत्यू (Death of young police recruit) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत्यू पावलेला 27 वर्षीय तरूण तुषार भालके संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. तुषार पुणे (Pune News) येथे सुरू असलेल्या पोलीस भरती (Police Bharti) दरम्यान धाव चाचणीत धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. दरम्यान त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. खाकी वर्दी घालून देशसेवा करण्याचे त्याचे आभाळा एवढे स्वप्न अपुरेच राहिले.
पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर पोलीस भारती प्रक्रिया सुरू आहे. तुषार भालके या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले. पण धावत असताना त्याच्या पायात अचानक क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलीस भर्ती अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून पुण्यातील ससून रुग्णालयात नेलं. पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडलं आणि त्यातच मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला.
राज्यभरातील अनेक तरूण आपल्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्याचप्रमाणे तुषार मागील काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता. परीक्षेचे तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे गाठलं. मात्र पोलीस बनायचं त्याचे हे स्वप्न अंतिम चाचणीत स्वप्नच राहिले आणि त्याने पोलीस मैदानातच शेवटचा श्वास घेतला. या घटणेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून ह्या घटनेमुळे भालके कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळले आहे.
_______________________
पुण्यात पोलीस भरतीच्या दरम्यान आपल्या संगमनेर तालुक्यातील तुषार भालके ह्या युवकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची बातमी कळाली. पोलीस आर्मी तसेच इतर सरकारी नोकरीच्या जीवघेण्या स्पर्धात्मक प्रक्रियेत तरुण-तरुणी धावपळ करतात व अनेकदा ह्यात खूप तणावाखाली राहतात. आनंदी व यशस्वी जीवनासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनात एक संधी गेली तर दुसरी येत असते फक्त आपण खुल्या मनाने संधी शोधल्या पाहीजे.
सत्यजित तांबे, आमदार , विधान परिषद,