हा महाराष्ट्र द्रोह, राज ठाकरेंचा राज्यातील मुख्याध्यापकांना इशारा..
"राज्य सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू," असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मुख्याध्यापकांना दिला आहे. याबाबचे पत्र राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
"राज्य सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा (Hindi Language Compulsory) शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू," असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील मुख्याध्यापकांना दिला आहे. याबाबचे पत्र राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? गुजरात सरकारचा जीआर आहे. पहिलीपासून गुजराती गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही. महाराष्ट्रासाठी राज्यातील शाळांचे मुख्याध्यापक (State school principal) यांच्यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.
राज ठाकरे म्हणाले की, "आज मी तिसरं पत्र सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना पाठवणार आहे. तिसरी भाषा अनिर्वाय नाही मग पुस्तक छपाई का सुरु आहे? याला तुम्ही शाळांनी सहकार्य करु नका. हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे. जी भाषा सक्तीची नाही जीचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका."
तुम्ही आमच्या राज्यात तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करतायत. तुम्ही हे का लादताय यामागचं कारण काय आहे? ही सक्ती आपण का लादून घ्यायची? हिंदी लादल्यास उद्या मराठी भाषा संपण्याची भीती आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. "लेखक साहित्यिक कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. मराठी संपवून टाकतील हे... शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावे. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की, याला सगळ्यांनी विरोध करा. शाळा आता हिंदी भाषा कशा शिकवतात आता तेच आम्ही बघू. आयएस अधिकाऱ्यांना सोपं जाव, मराठी बोलायला लागू नये म्हणून ही सक्ती आहे का? आयएएस लॉबी हिंदी सक्तीच्या मागे आहे. माझ्याकडे त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत, असे देखील त्यांनी म्हटले.