'एआय'चा वापर अनिवार्य; प्रा. किरणकुमार जोहरे

भविष्यात प्राध्यापकांची जागा रोबोट्स घेतील का? हा प्रश्न चर्चेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रातील काही हॉटेलमध्ये वेटर म्हणून रोबोट्स कार्यरत आहेत, तर चीनमध्ये वकिली क्षेत्रात रोबोट्सचा वापर सुरू झाल्यावर वकिलांचा विरोध झाला.

'एआय'चा वापर अनिवार्य; प्रा. किरणकुमार जोहरे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बदलत्या तंत्रज्ञानासोबत मानव जातीलाही अस्तित्वासाठी एआय विधायक वापर अनिवार्य (AI constructor is mandatory) असून बदल स्वीकारावाच लागेल, असे मत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तज्ज्ञ आणि नाशिक मविप्रच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचे प्रा. किरणकुमार जोहरे (Prof. KiranKumar Johare) यांनी व्यक्त केले आहे.

 चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, चिंचवड येथे  (Pratibha College of Commerce and Computer Studies, Chinchwad)ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने जाहीर केलेल्या 'एआय वर्ष 2025' निमित्त एकदिवसीय कार्यशाळेत "एआय फॉर ऑल" (AI for All) या विषयावर ते बोलत होते.

जोहरे म्हणाले, "एआयचा नैतिक आणि विधायक वापर केल्यास अन्नसुरक्षा, कृषी, वैद्यकीय, उद्योग, शिक्षण आणि अवकाश संशोधन क्षेत्रात क्रांती घडू शकते," असेही जोहरे म्हणाले. अनेकांना फेसबुक व यूट्यूबवर थेट प्रक्षेपणाद्वारेही या कार्यशाळेचा लाभ घेता आला.

या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, समन्वयिका डॉ. राजश्री ननावरे यांच्यासह ऑनलाईन 3 हजार 500 विद्यार्थी आणि 115 प्राध्यापक सहभागी झाले होते.

रोबोट्स शिक्षकांची जागा घेतील ?

प्रा. किरणकुमार जोहरे यांनी एआयच्या संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकताना सांगितले की, शाळा-महाविद्यालयांमध्ये एआय तंत्रज्ञान येत आहे. भविष्यात प्राध्यापकांची जागा रोबोट्स घेतील का? हा प्रश्न चर्चेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रातील काही हॉटेलमध्ये वेटर म्हणून रोबोट्स कार्यरत आहेत, तर चीनमध्ये वकिली क्षेत्रात रोबोट्सचा वापर सुरू झाल्यावर वकिलांचा विरोध झाला. अमेरिकेत चित्रपट कथा व पटकथा लेखनासाठी रोबोट्स वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र तेथील लेखक त्याविरोधात आहेत.

"एआय कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी वरदान!"

स्वयंचलित कृषी उपकरणे आणि हवामानाचा अचूक माहिती मिळवण्यासाठी एआय तंत्र महत्त्वाचे ठरेल. औद्योगिक उत्पादन, वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि अवकाश संशोधनातही एआय रोबोट्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मंगळ आणि चंद्रावर पोहोचण्यामागेही कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे, असे प्रा. किरणकुमार जोहरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज यांनी "भावी पिढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार अनिवार्य" असल्याचे सांगत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रसिका पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. रूपा शहा यांनी करून दिला तर आभार डॉ. राजश्री ननावरे यांनी मानले.