अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्तीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरू
२०२४-२५ या शैक्षणिक (2024-25 academic year) वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील जे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यी परदेशात (Minority students) पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या योजनेंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील 75 विद्यार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्ती (Foreign Scholarship Opportunity) प्रदान करण्यात येते. २०२४-२५ या शैक्षणिक (2024-25 academic year) वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेंतर्गत (Qs World University Ranking) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्यावर सादर करावा. या योजनेसंबंधी शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विस्तृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी. या योजनेंतर्गत अल्पसंख्याक समुदायातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.
यासाठी काही अटी व शर्टी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदायातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाख इतके मर्यादित असावे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत २०० च्या आत असावी. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहित पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी. पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी. सर्व अटी व शर्ती शासन निर्णयानुसार लागू राहतील.