राज्य पुशवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर..
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पशुवैद्यकीय प्रवेशाकरिता अंतिम गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करून ही अंतिम गुणवत्ता यादी १४ ऑगस्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
NEET ची सुधारित रँकिंग (Revised Ranking of NEET) जाहीर होण्यापूर्वीच घाई गडबडीत राज्यातील पशुवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया रेटण्यात आली होती. त्याची दखल घेत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे (Maharashtra Animal and Fisheries Science University) आता नव्या गुणपत्रिकेच्या आधारावर सुधारित वेळापत्रक जाहीर (Revised time table announced on the basis of new mark sheet) करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार आत १४ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पशुवैद्यकीय प्रवेशाकरिता अंतिम गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करून ही अंतिम गुणवत्ता यादी १४ ऑगस्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एनटीएकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नव्या गुणपत्रकाच्या आधारावर ही प्रक्रिया पुढे ढकलली जाणार आहे.
पशुवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी नव्याने आलेली गुणपत्रिका ग्राह्य धरणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे जुने गुण आणि ऑल इंडिया रँक ग्राह्य धरून १८ जुलै रोजी पशुवैद्यकीय प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. फेर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी नसल्याने याचा फारसा परिणाम गुणवत्ता यादीवर झाला नव्हता. मात्र, २३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार भौतिकशास्त्र विषयाच्या एका वादग्रस्त प्रश्नाचे ग्राह्य धरलेले दोन पर्याय रद्द करून नवीन निकालानुसार एकच पर्याय बरोबर असल्याचे ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातीत विद्यार्थ्यांची रँक बदलली. गुणांमध्येही बदत झाले आहेत.
नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असतानाही महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया घाईघाईने राबविण्यात आली. यासाठी २५ जून ते ७ जुलैदरम्यान पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याचवेळी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत १ हजार ५६३ विद्यार्थ्यांची नीटची फेर परीक्षा घेऊन सर्व विद्यार्थ्यांचा सुधारित निकात ३० जून रोजी जाहीर केला. या निकालानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक बदलली. त्यामुळे सुधारित गुणपत्रिकेच्या आधारावर आता ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.