दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनीमध्ये सहाय्यक पदांच्या ५०० जागांसाठी भरती सुरू 

सहाय्यक पदांच्या एकूण ५०० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज प्रक्रिया १७ डिसेंबरपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जानेवारी २०२५ देण्यात आली आहे. 

दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनीमध्ये सहाय्यक पदांच्या ५०० जागांसाठी भरती सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क     

दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत सहाय्यक पदांच्या भरती प्रक्रियेची (Assistant post recruitment process) अधिसूचना जाहीर (Notification released) करण्यात आली आहे. त्यानुसार सहाय्यक पदांच्या एकूण ५०० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज प्रक्रिया १७ डिसेंबरपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जानेवारी २०२५ (Application deadline 1 January 2025) देण्यात आली आहे. 

या भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ https://www.newindia.co.in/ वर जाऊन अर्ज भरता येणार आहे. यासाठी उमेदवाराचे वय १ डिसेंबर रोजी २१ पेक्षा कमी आणि ३० पेक्षा जास्त असू नये. राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाणार आहे.  एसी/ एसटी/ पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना १०० अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. 

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवार ज्या राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि श्रेणीनुसार रिक्त पदासाठी अर्ज करत आहे, त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.