12 Exam Result : शाब्बास, 8 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण 

शिक्षण मंडळाकडून ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. यासाठी राज्यातून ८ लाख १० हजार ३४८ मुले आणि ६ लाख ९४ हजार ६५२ मुलींसह १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत काही विद्यार्थी हिऱ्यासारखे चमकले आहेत. 

12 Exam Result : शाब्बास, 8 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)  सोमवार ५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर (Class 12th results announced) करण्यात आला. या परीक्षेत ८ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवून (8 Thousand 352 students scored more than 90 points) घवघवीत यश संपादन केले आहे. याच परीक्षेत ८५ ते ९० गुण मिळणारे २२ हजार ३१७ विद्यार्थी आहेत. 

शिक्षण मंडळाकडून ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. यासाठी राज्यातून ८ लाख १० हजार ३४८ मुले आणि ६ लाख ९४ हजार ६५२ मुलींसह १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत काही विद्यार्थी हिऱ्यासारखे चमकले आहेत. 

राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारलीय आहे. मुलांचा निकाल ८९.५१ टक्के तर मुलींचा निकाल ९४.५८ टक्के लागला आहे. राज्यात निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर असून लातूर विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १.४९ टक्के निकाल घटला आहे. असे असले तरी हजारो विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासू बाणा दाखवत घवघवीत यश खेचून आणले आहे. 

या परीक्षेत ८० ते ८५ गुण मिळवणारे ४६ हजार ३३६ विद्यार्थी आहेत. तसेच ७५ ते ८० गुण मिळणारे ७४ हजार १७२, ७० ते ७५ गुण मिळवणारे १ लाख ३ हजार ७०, ६५ ते ७० गुण मिळवणारे १ लाख ३१ हजार ८१२, ६० ते ६५ गुण मिळवणारे १ लाख ८१ हजार ७५५, ४५ ते ६० गुण मिळणारे ६० हजार तर ४५ पेक्षा कमी गुण मिळवणारे १ लाख ८० हजार ५४७ विद्यार्थी आहेत. एकंदरीत एकूण निकालाची टक्केवारी घसरली असली तरी काही विद्यार्थ्यांनी मात्र आपली छाप दाखवून दिली आहे.