वादग्रस्त रत्नदीप कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे स्थलांतर अन् समायोजन 

रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याच वर्गात समायोजित करावयाचे आहे.

वादग्रस्त रत्नदीप कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे स्थलांतर अन्  समायोजन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University)संलग्न अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीमधील (Ratnadeep College of Pharmacy)सुमारे सुमारे 250 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने 251 विद्यार्थ्यांचे समायोजन (Adjustment of students)कोणत्या महाविद्यालयामध्ये करावे, या संदर्भातील सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रत्नदीप कॉलेज वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. विद्यार्थी व संस्था यांच्यातील वादामुळे , आंदोलने आणि पोलिसांचा हस्तक्षेप तसेच विद्यार्थी व विविध संघटनांची उपोषणे, यामुळे रत्नदीप कॉलेज चर्चेत राहिले. विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयामध्ये शिकायचेच नाही, असा पवित्रा घेत दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याबाबत विद्यापीठाकडे पाठपुरावा केला. त्यावर संस्थेने न्यायालयात धाव घेतले. परंतु, न्यायालयाने विद्यापीठ प्रशासन व शासन यांना यातून मार्ग काढण्यास सांगितले. अखेर विद्यापीठाने समिती स्थापन करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात समायोजित करण्यासंदर्भात निर्णय घेतला. संस्थांचालकच विद्यार्थीनींचा छळ करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. 

रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याच वर्गात समायोजित करावयाचे आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे कागदपत्र व शैक्षणिक शुल्कासह या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात समायोजित करण्याबाबत विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 26 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्यात यावी असे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी मूळ महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून सर्व कागदपत्रांसह नवीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया 26 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश न घेतल्यास याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांचीच राहील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे रत्नदीप महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने व प्राचार्यांनी त्वरित व विना विलंब विद्यार्थ्यांना द्यावेत एकही विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये याबाबत पक्षापासून घ्यावी. प्रवेश शैक्षणिक कागदपत्रे किंवा शैक्षणिक शुल्क यामुळे व इतर आवश्यक कागदपत्रांसाठी भविष्यात काही कायदेशीर तक्रारी व न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी रत्नदीप कॉलेज प्रशासनाचे राहील याची नोंद घ्यावी, असे परिपत्रक विद्यापीठाच्या संलग्नता कक्षाचे उपखलसचिव गिरीश बेत यांनी प्रसिद्ध केले आहे.