डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय पाण्यात  

कुलगुरू, कुलसचिवांसह विद्यापीठ प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांनी पाण्यात उतरून पुस्तके वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पाचारण करण्यात आलेले अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बंबच्या साहाय्यने रात्री उशिरापर्यंत तळघरातील पाणी उपसण्याचे काम सुरू होते. 

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय पाण्यात  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर येथे अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे  (Dr. Babasaheb Marathwada University) मध्यवर्ती ग्रंथालय (Central Library) जलमय झाले. विद्यापीठाच्या तळघरात असलेल्या ग्रंथालयात अचानक शिरलेल्या (Water entered the library) पाण्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. कुलगुरू, कुलसचिवांसह विद्यापीठ प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांनी पाण्यात उतरून पुस्तके वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पाचारण करण्यात आलेले अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बंबच्या साहाय्यने रात्री उशिरापर्यंत तळघरातील पाणी उपसण्याचे काम सुरू होते. 

विद्यापीठ परिसरात रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे समोरील रस्त्यावर साचलेले पाणी ओवर फ्लो झाल्याने पाण्याने आपला मार्ग बदलला व ते तळघरात शिरले. ग्रंथालय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा व अग्निशमन दलाशी संपर्क साधून गाडी बोलावून घेतली. दरम्यान दोन हजार पुस्तके भिजण्यापासून वाचवण्यात यश आल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

विद्यापीठात ज्या ठिकाणी पाणी शिरले त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तकांची कपाटे आहेत. या कपाटांमध्ये हजारो पुस्तके आहेत. यात संदर्भग्रंथासह, दुर्मिळ ग्रंथांसह इतर पुस्तके असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्व पुस्तक वाचवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची एकच धावपळ उडाली. अग्निशमनदलाचे पथक तात्काळ दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत पुस्तके तळघरातून बाहेर काढली. यामुळे सुदैवाने पुस्तकांचे नुकसान झाले नाही, असे सांगण्यात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या तळघरात बुधवारी सायंकाळी आलेल्या मोठ्या पावसामुळे पाणी शिरले. जवळपास दोन हजार पुस्तके तात्काळ बाहेर काढून भिजण्यापासून वाचविण्यात आली. मनपा अग्निशामक दलाचे पथक, गाडी मागवून तळघरात साठलेले पाणी काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक डॉ. वैशाली खापर्डे यांच्यासह सुरक्षा कर्मचारी, ग्रंथालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांनी पाणी बाहेर काढण्यासाठी व पुस्तक वाचविण्यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.