मणिपूर पुन्हा पेटलं! शाळा-महाविद्यालये बंद, इंटरनेट सेवाही बंद; वाचा सविस्तर...
15 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जवळपास 16 महिन्यांपासून हिंसाचाराचा सामना करत असलेल्या मणिपूरमध्ये (manipur) शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनांमध्ये आंदोलनकर्ते विद्यार्थी (Agitator students) आणि सुरक्षा दलांमध्ये (security forces) जोरदार चकमक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर राज्य सरकारने (State Govt) तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू (Curfew) लागू केला आहे. तर 11 आणि 12 सप्टेंबर असे दोन दिवस शाळा-महाविद्यालये बंद (Schools and colleges closed) ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय 15 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात इंटरनेटवरही बंदी (Internet is also banned) घालण्यात आली आहे.
मणिपूर सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने (Higher and Technical Education Department) जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. मणिपूरमधील शाळा ८ सप्टेंबरपासून बंद आहेत. परिस्थिती सुधारली नाही तर ही बंदी वाढवली जाणार आहे.
मणिपूरमधील हिंसाचाराची नवी लाट पाहून गृह मंत्रालयाने राज्यात 2 हजार सीआरपीएफ (CRPF) जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी इंफाळमध्ये आंदोलक विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाल्यामुळे मणिपूर पुन्हा पेटले आहे. मणिपूरमध्ये मागच्या वर्षी मे महिन्यात हिंसाचार सुरू झाला होता. आता यामध्ये 226 लोकांनी आपला जीव गमावला असून हजारो लोक बेघर झाले आहेत.