TAIT परीक्षेचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी TAIT या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी-TAIT) – २०२५ ला प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन अर्ज (Online application) करण्यास १४ मे २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक (Anuradha Oak, Commissioner of Maharashtra State Examination Council)यांनी कळविली आहे.त्यामुळे TAIT परीक्षेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी TAIT या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. एनसीएल प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीनुसार मिळालेले एनसीएल प्रमाणपत्र पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही ओक यांनी कळविले आहे.