वारे गुरुजींच्या शाळेचा जगात डंगा, जालिंदर नगरच्या शाळेला 'बेस्ट ऑफ द बेस्ट' पुरस्कार जाहीर..
मिळालेला पुरस्कार ही केवळ कागदोपत्री बाब नसून शिक्षणपद्धती, प्रेरणादायक मार्गदर्शन, सोयी-सुविधा आणि नैतिक मूल्यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता आणि जवळची भावनात्मक नाती निर्माण होतात आणि विद्यार्थ्यी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करतात, तेव्हा शाळेची प्रतिष्ठा आपोआप वाढते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले पुरस्कार, स्पर्धेमधील विषय आणि समाजसेवेतील योगदान यामुळे शाळेचे नाव जगभरात गाजते.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
पुणे जिल्हा परिषदेच्या जालिंदरनगर प्राथमिक शाळेला (Jalindarnagar Primary School) "वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज“ (World Best School Prize) - कम्युनिटी चॉइस अवॉर्ड" या पुरस्काराने T4 Education या जागतिक शैक्षणिक संस्थेने सन्मानित (Honored by a global educational organization) केले आहे. हे पुणे जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे. सदरचा पुरस्कार हा शाळेच्या नवकल्पना, सामाजिक प्रभाव आणि विद्यार्थी विकासासाठी दिला जातो. जगातील सर्वोत्कृष्ट प्रतिष्ठित पुरस्कार मिळविणे म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी हे यशाचे दोन प्रमुख आधारस्तंभ असलेले. त्यांच्या गुणवत्तेमुळे शाळेचा व पुणे जिल्ह्याचा नावलौकिक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय उपखंडातही विस्तारला आहे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे पुणे जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रात (Zilla Parishad publishes a pamphlet) म्हटले आहे.
प्राध्यापक भरतीचा जीआर लवकरच! वित्त विभागाची मान्यता प्रक्रिया पूर्ण; चंद्रकांत पाटील
मिळालेला पुरस्कार ही केवळ कागदोपत्री बाब नसून शिक्षणपद्धती, प्रेरणादायक मार्गदर्शन, सोयी-सुविधा आणि नैतिक मूल्यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता आणि जवळची भावनात्मक नाती निर्माण होतात आणि विद्यार्थ्यी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करतात, तेव्हा शाळेची प्रतिष्ठा आपोआप वाढते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले पुरस्कार, स्पर्धेमधील विषय आणि समाजसेवेतील योगदान यामुळे शाळेचे नाव जगभरात गाजते.
जिल्हा परिषदच्या जालिंद्रनगर प्राथमिक शाळेत विविध वयोगटातील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात व शिकतात असा सह अध्ययन मॉड्यूल्स शाळेत शैक्षणिक क्रांतिकारी बदल झाला आहे. अशा शाळा जगभरातील विद्यार्थ्यांना व पालकांना प्रेरणास्थान ठरतात. यामुळे शाळेचा नावलौकिक दीर्घकाळ टिकून राहतो आणि तो एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून मान्यतेस पात्र ठरते. याचे सातत्य टिकवण्यासाठी व अशाच इतरही संस्था निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यात सहभाग असलेल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यां, पालकांचे पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.