आयटीआय विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी; 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज..
शासकीय आयटीआयमध्ये 88 हजार 444, तर खासगी आयटीआयमध्ये 37 हजार 376 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. सहा फेऱ्यांनंतरही प्रवेश न घेतलेल्या किंवा नव्याने प्रवेश घ्यायचा आहे अशांना आता संधी देण्यात आली आहे. हे प्रवेश रिक्त जागांवर होणार आहे. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या सहा कॅप फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या. या सहा फेऱ्यांमधून 1 लाख 25 हजार 820 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित (Admission of 1 lakh 25 thousand 820 students confirmed) केले. यामध्ये 1 लाख 4 हजार 200 मुले व 21 हजार 619 मुलींचा सहभाग आहे.उर्वरित रिक्त जागांचा विचार करता कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या (Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशासाठी आणखी एक संधी दिली आहे. आयटीआय प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर (Application process starts till September 30) करू न शकलेल्यांना या महिनाअखेरपर्यंत म्हणजे घेता येणार आहे.
झोपलेल्या ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मित्रांनी टाकले फेविक्किक; डोळेच उघडेना
शासकीय आयटीआयमध्ये 88 हजार 444, तर खासगी आयटीआयमध्ये 37 हजार 376 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. सहा फेऱ्यांनंतरही प्रवेश न घेतलेल्या किंवा नव्याने प्रवेश घ्यायचा आहे अशांना आता संधी देण्यात आली आहे. हे प्रवेश रिक्त जागांवर होणार आहे. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. आतापर्यंत झालेल्या प्रवेशांमध्ये इलेक्ट्रिशियनसाठी सर्वाधिक म्हणजे 23 हजार 363 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्या नंतर फिटर या ट्रेडला 15 हजार 423 आणि वेल्डर या अभ्यासक्रमांसाठी 12 हजार 985 प्रवेश झाले आहेत.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रवेश अर्ज भरणे शक्य झाले नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जातील चुकांमुळे किंवा प्रवेश अर्ज शुल्क भरणे शक्य न झाल्याने प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता आले नाही अशा विद्यार्थ्यांना या वेळापत्रकानुसार संधी देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीत ज्या अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा आहेत, त्या जागांवर या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे अपेक्षित असल्याने आयटीआयसाठी गेल्या वर्षीएवढेच किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.