मासिक पाळीचे रक्त सांडल्याने, मुलींचे कपडे काढून शाळेतच केली तपासणी
या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मासिक पाळीचे रक्त सांडल्याने शाळेतल्या मुलींची तपासणी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. शहापूरमधल्या आर. एस. दामानिया शाळेवर पालकांनी हा गंभीर आरोप केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शहापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वच्छता गृहात मासिक पाळीचे रक्त सांडल्याने सहावी ते दहावीच्या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी केल्याचा आरोप पालकांनी शहापूरमधील आर. एस. दामानिया शाळेवर (R. S. Damania School Shahapur) केला आहे. मुलींचे कपडे काढून शाळेतल्या शिक्षिकेंनी तपासणी (Girls being stripped and examined) केली, मुख्यध्यापिकेच्या आदेशानुसारच हा प्रकार घडल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात आला आहे. सर्व मुलींच्या फिंगर प्रिंटही (Fingerprints of girls taken) शाळा प्रशासनाने घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे मुलींसह पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादीत 'त्या' विद्यार्थ्यांचा समावेश नाही
या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मासिक पाळीचे रक्त सांडल्याने शाळेतल्या मुलींची तपासणी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. शहापूरमधल्या आर. एस. दामानिया शाळेवर पालकांनी हा गंभीर आरोप केला आहे. स्वच्छता गृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्याने सहावी ते दहावीच्या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे, संतप्त पालकांकडून आंदोलन देखील करण्यात आलं आहे.
पालकांकडून या शाळेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुख्यध्यापिकेच्या आदेशानुसारच हा प्रकार घडल्याचा पालकांचा आरोप आहे. मुख्यध्यापिकेवर कारवाई करा, शाळेवर कारवाई करा, शाळेला ताळं ठोका अशी मागणी संतप्त पालकांनी केला आहे. पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं आहे. पालकांनी केलेल्या आरोपांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून 14 ते 15 वयोगटातील तब्बल १२ विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला. हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे कृत्य आहे. मासिक पाळी आली म्हणजे काय गुन्हा नाही… पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसिमा गाठणं म्हणजे लज्जास्पद बाब आहे. हि घडलेली घटना केवळ अमानवी नाही, तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक अपमान आहे.
चित्रा वाघ, आमदार