मुलींच्या वसतिगृहात दारुडे शिरले, ना सुरक्षारक्षकाची गस्त, प्रशासन सुस्त
जालना जिल्ह्यातील परतूर पासून काही अंतरावर असलेल्या अंबा परिसरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ही घटना घडली आहे. रात्री ८ च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीवर चढून आतमध्ये प्रवेश केला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुली राहात असलेल्या वसतिगृहात दारू पिऊन दोघांनी शिरकाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील (Jalna Crime News) परतूर पासून काही अंतरावर असलेल्या अंबा परिसरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात (Kasturba Gandhi Balika Vidyalaya) ही घटना घडली आहे. रात्री ८ च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीवर चढून (Entering the hostel under the influence of alcohol) आतमध्ये प्रवेश केला. या निमित्ताने वसतिगृह परिसरात सुरक्षारक्षकाची गस्त नसल्याचे आणि प्रशासन सुस्त असल्याचे समोर आले आहे.
या घटनेत कोणताही अनार्थ घटला नसल्या तरी मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे दारूडे आता का शिरले, त्यांचा उद्देश काय होता, त्यावेळी सुरक्षारक्षक काय करत होते, वसतिगृहाचे प्रशासनाचे लक्ष नव्हते का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आले.
वसतिगृहात मुली सावध असल्याने त्यांनी ही घटना वेळीच लक्षात आली. वसतिगृहात प्रवेश करणाऱ्या एका दारुड्याला सुरक्षा रक्षकासह विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिला. मागील काही महिन्यांपासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे उडाले आहेत. रोज बलात्कार, अत्याचार आणि मुलींच्या शोषनाच्या चार-दोन बातम्या समोर येतात. मात्र, शासन यावर काहीच कायमचा बंदोबस्त करायला तयार नाही. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढते आणि अशा घटना घडत राहतात.
याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, महादेव साठे, पवन दळवे अशी आरोपींची नावे आहेत. परतूर तालुक्यातील अंबा गावाबाहेर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व वसतिगृह आहे. येथे दोन स्वतंत्र इमारती आहेत. विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुली निवासी राहून त्याच ठिकाणी शिक्षण घेतात. तिथे हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.