पीएच.डी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ ; राज्यपालांकडे चौकशीची मागणी 

पीएच.डी प्रवेश प्रक्रिया त्वरित रद्द करावी आणि नवी पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी राज्यपाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

पीएच.डी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ ; राज्यपालांकडे चौकशीची मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) पीएच.डी प्रवेश प्रक्रियेची (Ph.D admission process) चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित पीएच.डी प्रवेश प्रक्रिया त्वरित रद्द (Cancel the PhD admission process immediately) करून नवी पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे (Rahul Sasane) यांनी राज्यपाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेल्या गंभीर नियमभंगाची बाब यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. वि‌द्यापीठाच्या आणि यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून अनेक अन्यायकारक आणि पक्षपाती पद्धती अवलंबल्या गेल्या आहेत. ज्यामुळे विशेषतः राखीव प्रवर्गातील पात्र उमेदवारांना अन्याय सहन करावा लागत असल्याचे आरोप ससाणे यांनी केले आहेत. 
 
विद्यापीठाच्या नियमानुसार, पीएच. डी. प्रवेशासाठी संशोधन केंद्रांमध्ये प्रवेश मुलाखतीच्या वेळी कुलगुरूंचे दोन नामनिर्देशित प्रतिनिधी उपस्थित असणे बंधनकारक असतात. मात्र, सदर मुलाखतीच्या वेळी बहुतेक विभाग व केंद्रामध्ये हे प्रतिनिधी अनुपस्थित होते. वि‌द्यापीठाच्या पोर्टलवर जाहीर केलेल्या जागा कोणतेही कारण न देता नंतर कमी करणे. नेट/सेट पात्र असलेल्या उमेदवारांना पीईटी उत्तीर्ण उमेदवारांपेक्षा प्राधान्य देण्यात आले. गुणवत्ता असूनही एससी/एसटी वि‌द्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातील जागांसाठी विचारात घेतले गेले नाही. विद्यापीठ व संलग्न महावि‌द्यालयांनी यूजीसी व राज्य सरकारच्या आरक्षण धोरणांचे पालन केले नाही. वि‌द्यापीठ व यूजीसीने ठरवलेल्या प्रवेश नियमांचे वारंवार उल्लंघन करून प्रवेश प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळून आल्या, असल्याचे ससाणे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

या प्रवेश प्रक्रियेत नियमभंग आणि अनियमितता झाली असून वि‌द्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय असून, वि‌द्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. म्हणून आपण या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. या गैरप्रकारांची स्वायत्त चौकशी केली जावी, अशी विनंती करण्यात आली आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी आणि चुकीच्या पद्धतीने झालेली ही पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच पुन्हा एकदा नव्याने पारदर्शक प्रकिया राबविण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी ससाणे यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे.