आधार आणि अपार प्रमाणित करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत मुदतवाढ..  

सर्वच विद्यार्थ्यांचे युडायस प्लस व सरल पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी आवश्यक आहे. मात्र, राज्यातील अद्याप ५.२८ टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा हे काम करण्यासाठी १४ एप्रिल २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

आधार आणि अपार प्रमाणित करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत मुदतवाढ..  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते बारावी (Students from class 1st to 12th) मध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे युडायस प्लस व सरल पोर्टलमधील (Students' UDIS Plus and Saral portal) स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी आवश्यक (Aadhaar registration required on student portal) आहे. मात्र, राज्यातील अद्याप ५.२८ टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा १४ एप्रिल २०२५ पर्यंतमुदत (Deadline until April 14, 2025) देण्यात आली आहे. 

सद्यस्थितीत राज्यात एकूण ९४.७२ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झाले आहे. विविध कारणास्तव विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित न होणे, आधार कार्ड उपलब्ध नसणे यामुळे १०० टक्के काम पूर्ण होताना दिसून येत नाही. त्यामुळे उर्वरित ५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीबाबत शाळा, केंद्र व तालुकास्तवर सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी तालुका स्तरावरून काही शाळांकरिता मिळून एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. प्रत्येक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झालेले नाही,त्या विद्यार्थ्यांचे नाव व कारणासह यादी शाळांनी तयार करावी. या विविध कारणांचा आढावा घेऊन अशा विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने कार्यवाही करता येईल. 

नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांनी आठवडयातून किमान दोन वेळा केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांचे कडून नियमित आढावा घ्यावा. प्रसंगी शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांचेद्वारा आयोजित केलेल्या केंद्र प्रमुख यांच्या ऑनलाईन आढाव्यामध्ये सहभाग घेऊन येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करावे. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी आठवड्यातून किमान एकदा गटशिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी. 

यासाठी १५ एप्रिलपर्यंत विशेष मोहिम राबवून प्रत्येक शाळेतील शिल्लक आधार प्रमाणित असलेल्या विद्यार्थी निहाय काम केल्यास नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये १०० टक्के आधार प्रमाणित करण्याची कार्यवाही पूर्ण होईल. तसेच, आधार प्रमाणित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या APAAR ID ची देखिल कार्यवाही पूर्ण करावी. तरी शासन निर्णयामध्ये नमूद बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते नियोजन करून राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करून आधार प्रमाणित होतील,असे परिपत्रक शिक्षण आयुक्त यांनी प्रसिध्द केले आहे.