तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षा अर्ज नोंदणी वेळापत्रकात बदल..
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता दिलेल्या पदविका अभ्यासक्रमातील तसेच शासनमान्य अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना १ ते १२ सप्टेंबरदरम्यान अर्ज करण्याची मूळ मुदत देण्यात आली होती. मात्र, आता या वेळापत्रकात बदल करून ८ ते १९ सप्टेंबर दरम्यान नियमित शुल्कासह नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Technical Education) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ (Academic year 2025-26) करिता प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश (First year and direct second year admission) घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी आणि हिवाळी-२०२५ परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल जाहीर (Schedule changes) केले आहेत. तंत्रशिक्षण संचालालयाकडून प्रवेशाच्या अंतिम तारखेत फेरबदल झाल्यामुळे मंडळाने सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध (Revised schedule released) केले आहे. नवीन वेळापत्रकानुसार, ८ ते १९ सप्टेंबर या कालावधीत आता विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
नववी, दहावीत शिकणाऱ्या १२.६% मुले आणि १०.३% मुलींनी शिक्षण सोडले; अहवालातून समोर
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता दिलेल्या पदविका अभ्यासक्रमातील तसेच शासनमान्य अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना १ ते १२ सप्टेंबरदरम्यान अर्ज करण्याची मूळ मुदत देण्यात आली होती. मात्र, आता या वेळापत्रकात बदल करून ८ ते १९ सप्टेंबर दरम्यान नियमित शुल्कासह नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत अर्ज करता येणार नाही, त्यांना २० ते २३ सप्टेंबरदरम्यान २०० रुपये दंडासह अर्ज करण्याची मुभा राहील. त्यानंतर २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान दीड हजार रुपये दंडासह अर्ज स्वीकारले जातील. विभागीय कार्यालय स्तरावर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी व सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान निश्चित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, हीच पद्धत एआयसीटीई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाबरोबरच अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठीही लागू राहणार आहे. मात्र, त्यांचे परीक्षा अर्ज संस्था स्तरावर नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच व विभागीय कार्यालयाने पडताळणी करून निश्चित केल्यानंतरच ग्राह्य धरले जाणार आहेत.
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक लागू असले, तरी इतर सर्व सत्रांतील विद्यार्थ्यांनी पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा अर्ज भरावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थाप्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे. विभागीय कार्यालयामार्फत निश्चित झालेले अर्जच हिवाळी-२०२५ परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे विद्यार्थी व संस्था यांनी मुदतींचे काटेकोर पालन करावे, असे सचिव उमेश नागदेवे यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.