पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या पात्रता व अटींमध्ये पुन्हा बदल
संबंधित कर्मचारी इयत्ता १० वीची परीक्षा किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे, त्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किमान सहा वर्षाची आणि इयत्ता १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यास ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे, त्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किमान पाच वर्षाची अखंडीत नियमित सेवा पूर्ण केलेली असावी.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector Post Recruitment) संवर्गातील परीक्षा पात्रता अटींमध्ये पुन्हा एकदा बदल (Changes in exam eligibility conditions) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध (Government decision published) करण्यात आला आहे. नव्या पात्रता अटींनुसार आता पोलीस शिपायांना देखील पीएसआय होण्याची संधी मिळणार. पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे यापुढे सरळसेवेने ५० टक्के, मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे २५ टक्के आणि २५ टक्के पदोन्नतीने (25 percent and 25 percent promotion through departmental examination) भरण्यात येणार. सद्यःस्थितीत पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी पात्र असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाकरिता शैक्षणिक सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री अजित पवार
संबंधित कर्मचारी इयत्ता १० वीची परीक्षा किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे, त्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किमान सहा वर्षाची आणि इयत्ता १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यास ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे, त्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किमान पाच वर्षाची अखंडीत नियमित सेवा पूर्ण केलेली असावी.
पदवी परीक्षा किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यास परीक्षा घ्यायची असलेल्या वर्षी १ एप्रिल रोजी अखंडीत नियमित सेवेची चार वर्ष पूर्ण केलेली असावी. कर्मचाऱ्याचे वय संबंधित परीक्षा वर्षाच्या १ एप्रिल रोजी वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्याबाबत वयोमर्यादा पाच वर्ष शिथील असणार आहेत.
अर्ज सादर करताना दक्षतेच्या दृष्टीकोनातून कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी, फौजदारी कारवाई सुरू नसावी. कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयाला तशा पद्धतीने प्रमाणपत्र सादर करावे लागेल. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी परीक्षा यांचा अंतर्भाव. त्यासाठीचे गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा निश्चित केले जाणार आहेत. या परीक्षेची गुणवत्ता यादी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून तयार केली जाईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.