अग्निवीर योजनेत मोठा बदल! अर्ज भरताना 'ही' गोष्ट करावीच लागेल, अन्यथा नोकरीला मुकावे लागेल.. 

अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता अर्ज करताना त्यांचा ट्रेड पसंतीक्रम प्रविष्ट करावा लागेल. दहावी उत्तीर्ण उमेदवार जास्तीत जास्त नऊ ट्रेड निवडू शकतात. आठवी उत्तीर्ण उमेदवार फक्त दोन ट्रेड निवडू शकतील. जर उमेदवाराने अर्ज करताना ट्रेड निवडला नाही, तर त्यांचे नाव गुणवत्ता यादीत आले तरीही त्यांना भरती केले जाणार नाही. जर एखाद्या उमेदवाराने त्यांच्या पसंतीक्रमात विशिष्ट ट्रेड निवडला नाही आणि त्या ट्रेडमध्ये रिक्त जागा नंतर उपलब्ध झाली नाही, तर त्यांना अपात्र ठरवले जाईल, असेही लष्कराने स्पष्ट केले आहे.

अग्निवीर योजनेत मोठा बदल! अर्ज भरताना 'ही' गोष्ट करावीच लागेल, अन्यथा नोकरीला मुकावे लागेल.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय सैन्यात भरती (Recruitment in Indian Army) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी अग्निवीर भरती २०२६ (Agniveer Recruitment 2026) बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याने भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच काही महत्त्वाचे नियम बदलले (Important rules have changed) आहेत. ट्रेड्समन श्रेणीमध्ये अर्ज करणाऱ्या तरुणांसाठी हा बदल विशेषतः महत्त्वाचा आहे. भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जारी केलेल्या सूचनेनुसार, अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी (The rules for the Agniveer Tradesman post have been changed) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता अर्ज करताना त्यांचा ट्रेड पसंतीक्रम प्रविष्ट करावा लागेल.

हेही वाचा - CTET Exam : सीटीईटी परीक्षार्थींना गळ्यातील मंगळसूत्र काढण्याच्या सूचना, महिला उमेदवारांची तारांबळ

दहावी उत्तीर्ण उमेदवार जास्तीत जास्त नऊ ट्रेड निवडू शकतात. आठवी उत्तीर्ण उमेदवार फक्त दोन ट्रेड निवडू शकतील. जर उमेदवाराने अर्ज करताना ट्रेड निवडला नाही, तर त्यांचे नाव गुणवत्ता यादीत आले तरीही त्यांना भरती केले जाणार नाही. जर एखाद्या उमेदवाराने त्यांच्या पसंतीक्रमात विशिष्ट ट्रेड निवडला नाही आणि त्या ट्रेडमध्ये रिक्त जागा नंतर उपलब्ध झाली नाही, तर त्यांना अपात्र ठरवले जाईल, असेही लष्कराने स्पष्ट केले आहे.

अग्निवीर भरती २०२६ साठी ३ फेब्रुवारी रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, काही बदलाव करण्यासाठी ही तारीख वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली. योजनेत बदल केल्यानंतर अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल असे लष्कराने म्हटले आहे. या भरतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना एकाच अर्ज फॉर्मवर दोन वेगवेगळ्या पदांसाठी सहभाग नोंदवता येणार आहे. या भरती अंतर्गत अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल, क्लर्क/स्टोअरकीपर, ट्रेड्समन (आठवी आणि दहावी उत्तीर्ण), सैनिक फार्मा, नर्सिंग असिस्टंट आणि महिला मिलिटरी पोलिस ही पदे समाविष्ट आहेत.

अग्निवीर भरती २०२६ साठी उमेदवारांचे वय १७.५ ते २१ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता बदलते. अग्निवीर जीडीसाठी १० वी उत्तीर्ण आणि किमान ४५% गुण आवश्यक आहेत; तांत्रिक पदांसाठी १२ वी इयत्तेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये किमान ४५% गुण आवश्यक आहेत; क्लर्क/स्टोअरकीपरसाठी १२ वी इयत्तेत ६०% गुणांसह टायपिंग चाचणी आवश्यक आहे. ट्रेड्समन पदांसाठी ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.