गुर्हाळ संपेना! अकरावी प्रवेशासाठी आणखी एका विशेष फेरीचे आयोजन
काही विद्यार्थी अद्याप प्रवेश निश्चित करू शकलेले नाहीत. त्यांच्यासाठी सदर फेरीचे आयोजन केले असून, वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी, पालक व प्राचार्यानी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्याकडून करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे (11th online admission process) गुर्हाळ का संपायचे नाव घेताना दिसत नाही. ऑनलाइन आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यात १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी (14 lakh 85 thousand 686 student registration) केली होती. त्यापैकी १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित (Admission of 13 lakh 33 thousand 893 students confirmed) केला आहेत. अद्याप काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने दि. २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान अंतिम विशेष फेरी राबविण्यात येत आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर (Director of Education Dr. Mahesh Palkar) यांनी ही माहिती दिली. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.
या अंतिम फेरी म्हणत शिक्षण मंडळाने अनेक फेऱ्या राबविल्या. वेळापत्रकामुळे त्यात आणखी एका महाविद्यालयांची राज्यातील संख्या विचारात घेता एकूण प्रवेश क्षमता २१ लाख ५९ हजार २३२ इतकी आहे. पण, प्रत्यक्षात १४ लाख ८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) पूर्ण करून अंतिमतः सहभाग नोंदविला आहे. असे असले तरी अद्याप जवळपास दीड लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे. हे विचारात घेऊन शिक्षण विभागाकडून या विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
काही विद्यार्थी अद्याप प्रवेश निश्चित करू शकलेले नाहीत. त्यांच्यासाठी सदर फेरीचे आयोजन केले असून, वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी, पालक व प्राचार्यानी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्याकडून करण्यात आले आहे.