पूर्व वैमनस्यातून रॅगिंग विरोधी नियमांच्या आधारे विद्यार्थ्यावर कारवाई

डिसेंबर २०२४ मध्ये आंतर IISER स्पोर्ट्स इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी उमाशंकर राजपूत आणि पूजित वाशिष्ठ यांच्याकडे सहभागी झालेल्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठीच्या मेस समिती चे काम होते. स्पोर्ट्स इव्हेंट सुरु झाल्यानंतर उमाशंकर राजपूत आणि पूजित वाशिष्ठ यांच्या मध्ये काम करण्यावरून शाब्दिक चकमक झाली. ते प्रकरण तिथेच मिटले.

पूर्व वैमनस्यातून रॅगिंग विरोधी नियमांच्या आधारे विद्यार्थ्यावर कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन आणि रिसर्च या संस्थेत (Indian Institute of Science, Education and Research Institute) रॅगिंग विरोधी नियमांचा (Anti-ragging rules) आधार घेऊन एका विद्यार्थ्याच्या विरोधात पूर्वीचा राग मनात धरून कारवाई केल्याचा प्रकार घडला आहे. या बाबत संबंधित विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) संस्थेविरोधात धाव घेतली आहे, अशी माहिती अॅड. कौस्तुभ पाटील (Adv. Kaustubh Patil) यांनी दिली आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये आंतर IISER स्पोर्ट्स इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी उमाशंकर राजपूत आणि पूजित वाशिष्ठ यांच्याकडे सहभागी झालेल्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठीच्या मेस समिती चे काम होते. स्पोर्ट्स इव्हेंट सुरु झाल्यानंतर उमाशंकर राजपूत आणि पूजित वाशिष्ठ यांच्या मध्ये काम करण्यावरून शाब्दिक चकमक झाली. ते प्रकरण तिथेच मिटले.

पोषण आहार आधी मुख्याध्यापक, शिक्षक खाणार; मगच विद्यार्थ्यांना देणार...

परंतु संस्थेतील प्राध्यापक नागराज बालसुब्रमण्यम हे ३ फेब्रुवारी २०२५ मध्ये डीन स्टुडंट्स अफेअर झाल्यानंतर त्यांनी उमाशंकर राजपूत याच्यावरील पूर्वीचा राग मनात धरून पूजित यास उमाशंकर राजपूत विरोधात तक्रार करायला लावली. नागराज बालसुब्रमण्यम याच्या हलगर्जीपणामुळे संस्थेतील एका विद्यार्थ्यांचे प्राण गेले होते. याबद्दल उमाशंकर राजपूत याने आवाज उठविला होता. याचा नागराज याच्या मनात राग होता.

पूजित याने ५ फेब्रुवारी २०२५ ला तक्रार केली. उमाशंकर यास ७ मार्च २०२५ ला रॅगिंग विरोधी समितीने भेटण्यास बोलावले. त्या नंतर २२ मार्च ला बोलावले परंतु दोन्ही मीटिंग मध्ये उमाशंकर याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. २५ एप्रिल ला रॅगिंग विरोधी समितीने आपला अहवाल दिला व त्या आधारे ५ मे २०२५ रोजी उमाशंकर याची PhD डिग्री पुढील ६ महिन्यासाठी थांबविण्यात आली.

उमाशंकर याने संस्थेचे डायरेक्टर सुनील भागवत यांची भेट घेतली व घडलेला सर्व प्रकार सांगितला व कारवाई मागे घेण्याची विनंती केली व डिग्री पदवीदान समारंभात देण्याची मागणी केली. भागवतांनी उमाशंकर यास सांगितले की माफी मागितली तर पदवीदान समारंभात पदवी देऊ. त्याप्रमाणे उमाशंकर याने माफी मागितली परंतु भागवत यांनी आपला शब्द पाळला नाही. उमाशंकर यास पदवीदान समारंभात पदवी दिली नाही.

या सर्व एकतर्फी आणि अन्यायकारक कारवाईच्या विरोधात उमाशंकर याने अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या मार्फत उच्च नायालयात याचिका दाखल केली आहे. "उमाशंकर याच्या विरोधातील कारवाई एकतर्फी, अन्यायकारक व नैसर्गिक न्यायच्या तत्वाच्या विरोधात आहे. नागराज यांनी सूड भावनेतून कारवाई केली आहे." असे अॅड. कौस्तुभ पाटील यांनी सांगितले आहे.