सरकारी नोकरीच्या परीक्षांमध्ये आता आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी

परीक्षा प्रणालीतील ओळखीशी संबंधित अनियमितता आणि फसवणूक रोखण्यासाठी हे नवीन पाऊल प्रभावी ठरेल. अनेकदा असे दिसून येते की काही उमेदवार इतरांच्या परीक्षेच्या ठिकाणी बसतात किंवा त्यांची ओळख लपवून परीक्षेला बसतात. आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणीमुळे अशा शक्यतांना आळा बसेल,' असा विश्वास आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

सरकारी नोकरीच्या परीक्षांमध्ये आता  आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (staff selection commission) एसएससी ने त्यांच्या आगामी सर्व भरती परीक्षांमध्ये आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. (Aadhaar based biometric verification to be included in all upcoming recruitment exams)ही प्रणाली मे २०२५ पासून लागू केली जाईल आणि सध्या ती ऐच्छिक असेल. या निर्णयाचा उद्देश परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत करणे आहे.
एसएससी ही देशातील सर्वात मोठ्या भरती एजन्सींपैकी एक आहे, जी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये नॉन-राजपत्रित पदांवर नियुक्तीसाठी परीक्षा घेते. अधिकाऱ्यांच्या मते, उमेदवार आता ऑनलाइन नोंदणी, अर्ज भरताना आणि परीक्षा केंद्रांवर त्यांची उपस्थिती नोंदवताना आधार वापरून त्यांची ओळख पडताळू शकतील.
 'परीक्षा प्रणालीतील ओळखीशी संबंधित अनियमितता आणि फसवणूक रोखण्यासाठी हे नवीन पाऊल प्रभावी ठरेल. अनेकदा असे दिसून येते की काही उमेदवार इतरांच्या परीक्षेच्या ठिकाणी बसतात किंवा त्यांची ओळख लपवून परीक्षेला बसतात. आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणीमुळे अशा शक्यतांना आळा बसेल,' असा विश्वास आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

 १२ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत, केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने ऐच्छिक आधारावर SSC ला आधार प्रमाणीकरणाची परवानगी दिली होती. याअंतर्गत, आयोग सात प्रमुख अखिल भारतीय परीक्षा आयोजित करतो ज्यामध्ये संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (CGL) आणि तीन विभागीय स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आधीच आधार आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू केली आहे.