कडक सुरक्षा व्यवस्थेत काही तासात सुरू होईल NEET UG परीक्षा 

 परीक्षेपूर्वी, दरम्यान किंवा नंतर अनुचित मार्ग वापरणाऱ्या उमेदवारांवर अनुचित मार्ग (UFM) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. एनटीए परीक्षेत बसण्यास  ३ वर्षांपर्यंत बंदी घालू शकते आणि सार्वजनिक परीक्षा (अन्याय्य साधन प्रतिबंधक) कायदा, २०२४ अंतर्गत फौजदारी आणि/किंवा कायदेशीर कारवाई करू शकते.

कडक सुरक्षा व्यवस्थेत काही तासात सुरू होईल NEET UG परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ज्या दिवसाची देशभरातील  लाखो उमेदवार वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. आणखीन काही तासात NEET UG परीक्षा सुरू होणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या कथाकथित  पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परीक्षा कडक सुरक्षा व्यवस्थेखाली घेण्यात येत आहे. (This year, the NEET UG exam is being conducted under strict security arrangements) आज दुपारी दोन वाजल्यापासून   देशभरातील ५५०० केंद्रांवर ही परीक्षा  घेतली जाईल. या वर्षी २२.७ लाखांहून अधिक उमेदवारांनी नीट यूजीसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा अशा तिन्ही पातळ्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्या भागातील जिल्हा दंडाधिकारी आणि दंडाधिकारी स्वतः परीक्षा केंद्रांना भेट देतील.

3 वर्षापर्यंत लागू शकते बंदी 

 परीक्षेपूर्वी, दरम्यान किंवा नंतर अनुचित मार्ग वापरणाऱ्या उमेदवारांवर अनुचित मार्ग (UFM) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. एनटीए परीक्षेत बसण्यास  ३ वर्षांपर्यंत बंदी घालू शकते आणि सार्वजनिक परीक्षा (अन्याय्य साधन प्रतिबंधक) कायदा, २०२४ अंतर्गत फौजदारी आणि/किंवा कायदेशीर कारवाई करू शकते.

  NTA कडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, यावेळी ९३ टक्के नीट यूजी परीक्षा सरकारी शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये घेतल्या जातील. परीक्षा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावी यासाठी ३ मे २०२५ रोजी सर्व केंद्रांवर मॉक ड्रिलचे नियोजन करण्यात आले होते. सर्व मोबाईल सिग्नल जॅमर योग्यरित्या काम करत आहेत याची खात्री करण्यास देखील सांगण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवर योग्य तपासणीसाठी पुरेशा मनुष्यबळाची उपलब्धता आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रक्रिया, इतर व्यवस्था सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

उष्णतेमुळे परीक्षा केंद्रांवर पाण्याची योग्य व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, केंद्रांवर वीजपुरवठा सुरळीत राहील याची खात्री करण्यास सांगितले आहे. आवश्यक असल्यास, आपत्कालीन आरोग्य सहाय्यासाठी पोर्टेबल शौचालये आणि प्रथमोपचार आणि रुग्णवाहिका सेवा देखील प्रदान केल्या जातील.
परीक्षा दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत पेन-पेपर पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे कारण कोणत्याही परिस्थितीत उशिरा येणाऱ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.