केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू
केंद्रीय विद्यालय संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे किमान वय ६ वर्षे असावे. याशिवाय बाल वाटिका-१, २ आणि ३ मध्ये प्रवेशासाठीचे वय अनुक्रमे ३ ते ४ वर्षे, ४ ते ५ वर्षे आणि ५ ते ६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
केंद्रीय विद्यालय संघटनेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे किमान वय ६ वर्षे असावे. याशिवाय बाल वाटिका-१, २ आणि ३ मध्ये प्रवेशासाठीचे वय अनुक्रमे ३ ते ४ वर्षे, ४ ते ५ वर्षे आणि ५ ते ६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
केव्ही मध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला https://kvsangathan.nic.in ला भेट द्यावी लागेल. इयत्ता पहिली आणि बाल वाटिका १ आणि २ च्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज ७ मार्चपासून सकाळी १० वाजता सुरू होतील. या वर्गांसाठी अर्ज २१ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. वर्गात निवड झालेल्या उमेदवारांची पहिली यादी आणि प्रतीक्षा यादी २५ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल. बाल वाटिकेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी २६ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल. के व्ही प्रवेशासाठी दुसरी यादी २ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल, (पहिल्या यादीनंतर जागा रिक्त राहिल्यास) बाल वाटिकेत जागा रिक्त राहिल्यास, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी दुसरी अधिसूचना ७ एप्रिल रोजी जारी केली जाईल. अशा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ८ एप्रिलपासून सुरू होईल. बाल वाटिका-२ आणि वर्ग-२ आणि यासारख्या इतर वर्गांमध्ये प्रवेश दिला जाईल.