पुण्यातून CBSE 12 वी चे 90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण तर नवोदय चे विद्यार्थी ठरले देशात अव्वल
विभागनिहाय निकालात विजयवाडा विभागाने उत्तम कामगिरी करत त्यांची उततीर्णतेची टक्केवारी 99.60 टक्के आहे. त्याखालोखाल चेन्नई आणि त्रिवेंद्रम या विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी अनुक्रमे ९९.३२% आणि ९७.३९% इतकी आहे. तर पुणे 9 व्या क्रमांकावर असून इथली उत्तीर्णतेची टक्केवारी 90.93 टक्के इतकी आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) CBSE २०२५ चा बारावीचा निकाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीचा आकडा पाहिला तर नवोदय विद्यालयाचे (Navodaya Vidyalaya) विद्यार्थी देशात अव्वल ठरले असून या शाळांमधून 99. 29 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुण्यातील CBSE शाळांमधून 90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात.
या वर्षी, जवाहर नवोदय विद्यालय (JNV) च्या विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ९९.२९% होता, जो सर्व प्रकारच्या शाळांमध्ये सर्वाधिक आहे. त्यानंतर केंद्रीय विद्यालय (केव्ही) चा निकाल ९९.०५% इतका लागला. त्याच वेळी, सरस्वती विद्या मंदिर/एसटीएसएस शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ९८.९६% होता. सरकारी अनुदानित शाळांचा निकाल ९१.५७% लागला, तर सरकारी शाळांचा निकाल ९०.४८% लागला. तर दुसरीकडे खाजगी शाळांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ८७.९४% आहे. हे आकडे शाळानिहाय विद्यार्थ्यांची कामगिरी दर्शवितात, ज्यावरून स्पष्ट होते की सरकारी आणि खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी अनुदानित आणि प्रतिष्ठित शाळांनी जास्त यश मिळवले आहे.
विभागनिहाय निकालात विजयवाडा विभागाने उत्तम कामगिरी करत त्यांची उततीर्णतेची टक्केवारी 99.60 टक्के आहे. त्याखालोखाल चेन्नई आणि त्रिवेंद्रम या विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी अनुक्रमे ९९.३२% आणि ९७.३९% इतकी आहे. तर पुणे 9 व्या क्रमांकावर असून इथली उत्तीर्णतेची टक्केवारी 90.93 टक्के इतकी आहे.