बस समस्यांची हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी वरदान, आठवड्यात तब्बल ३०८ तक्रारींची नोंद
तक्रारींमध्ये अनेक गंभीर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहेत, या तक्रारी थेट मंत्र्यांच्या निदर्शनाखाली आल्या आहेत. यामध्ये वेळेवर बस न येणे, बस थांब्यावर न थांबणे, पासधारकांना प्रवेश नाकारणे यासारख्या गंभीर समस्यांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आता गांभीर्याने घेतले जात आहे.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेवर अवलंबून असलेल्या लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी (Student bus complaint) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी नुकताच सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ हा (Helpline for students) एक मोठा आधार ठरला आहे. विद्यार्थ्यांची सोय (Bus problem helpline) आणि सुरक्षितता हा उदात्त हेतू ठेवून सुरू केलेल्या या हेल्पलाईनवर, अवघ्या काही दिवसांत तब्बल ३०८ तक्रारींची नोंद (308 complaints registered)झाली आहे. ही आकडेवारी तात्पुरती चिंता दर्शवत असली तरी, ती एसटी प्रशासनाला मूलभूत त्रुटी सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
नोंदवलेल्या तक्रारींमध्ये अनेक गंभीर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहेत, या तक्रारी थेट मंत्र्यांच्या निदर्शनाखाली आल्या आहेत. यामध्ये वेळेवर बस न येणे, बस थांब्यावर न थांबणे, पासधारकांना प्रवेश नाकारणे यासारख्या गंभीर समस्यांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आता गांभीर्याने घेतले जात आहे. नियोजित थांब्यांवरही बस थांबत नसल्याच्या तक्रारींवर तातडीने लक्ष केंद्रित केले जात आहे.याशिवाय लांब पल्ल्याच्या बसमध्ये पासधारक शालेय विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी तात्काळ हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ' कामाला न जुमानल्यास कठोर कारवाई ' करण्याची मानसिकता निर्माण होऊन व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत.
तक्रार पेटी नव्हे, १००% निराकरण केंद्र
एसटी महामंडळाने आता केवळ हेल्पलाईनवर तक्रारींची नोंद न घेता, या ३०८ तक्रारींचा आधार घेऊन मूलभूत कामकाजात आणि कर्मचारी मानसिकतेत त्वरित सकारात्मक सुधारणा कराव्यात.असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करणे हे एसटी महामंडळाचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. मंत्री महोदयांनी आता तक्रारींच्या '१००% निराकरणावर' लक्ष केंद्रित केल्यास, हा हेल्पलाईन क्रमांक केवळ "तक्रार पेटी" न राहता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे 'विश्वास केंद्र' बनेल. असे मत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केले आहे.