UPSC Recruitment : परीक्षा न घेता थेट भरती, मंत्रालयातील विविध जागांसाठी अर्ज सुरू

इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. यासाठी एकूण ४५ पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

UPSC Recruitment : परीक्षा न घेता थेट भरती, मंत्रालयातील विविध जागांसाठी अर्ज सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्र सरकारची नोकरी (Central Govt Jobs) करण्याचे स्वप्न पाहाताय तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण युपीएससीने (UPSC) कोणतीही परीक्षा न घेता थेट मंत्रालयात विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू (The recruitment process for various posts in the ministry has started) केली आहे. आयोगाने यासंदर्भात नुकतेच नोटीफिकेशन प्रसिद्ध (Notification published) केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ  upsconline.nic.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत  १७ सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. यासाठी एकूण ४५ पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने  ३ वर्षांच्या करारावर भरली जाणार आहेत. 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल, वित्त आणि गृह व्यवहार आणि मुख्यालये नवी दिल्ली येथे असलेल्या विभागांसह मंत्रालयांमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी यांच्या प्रतिनियुक्तीवर कंत्राटी पद्धतीने या जागा भरल्या जाणार आहेत. यासंदर्भात  युपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

यामध्ये जॉइंट सेक्रेटरी, संचालक, उपसचिव यांसारख्या ४५ पदांसाठी थेट भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना संकेतस्थळावर पदासाठीची पात्रता आणि निकष इत्यादी माहिती मिळेल. प्रत्येक पदासमोर Apply Now या पर्यायावर क्लिक केल्यास संबंधित पदाबाबत आणि त्याच्या पात्रतेबद्दल माहिती मिळेल. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना UPSC वेबसाइटवर प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागणार आहे.