आयआयएम मुंबईमध्ये मुलींचा टक्का कमी, प्रवेशासाठी प्रशासनाला करावे लागणार प्रयत्न 

सध्याच्या युगात मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली स्वत:चे स्थान निर्माण करताना दिसत आहेत. असे असताना आयआयएम मुंबई संस्थेतील एकूण १ हजार १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ ३८१ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्याचे प्रमाण जवळपास ३५ टक्के असून ते मुलांच्या तुलनेत खुपच कमी आहे. त्यामुळे हे प्रमाण भरून काढण्यासाठी आयआयएम प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. 

आयआयएम मुंबईमध्ये मुलींचा टक्का कमी, प्रवेशासाठी प्रशासनाला करावे लागणार प्रयत्न 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (IIM Mumbai) संस्थेच्या मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातील (Management courses) एकूण विद्यार्थ्यांचा आकडा जाहीर करण्यात आला आहे. यामधून एक चिंताजनक बाब समोर आली आहे. सध्याच्या युगात मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली स्वत:चे स्थान निर्माण करताना दिसत आहेत. असे असताना आयआयएम मुंबई संस्थेतील (IIM Mumbai Institute) एकूण १ हजार १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ ३८१ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्याचे प्रमाण जवळपास ३५ टक्के असून ते मुलांच्या तुलनेत खुपच कमी (Low proportion of girls) आहे. त्यामुळे हे प्रमाण भरून काढण्यासाठी आयआयएम प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. 

केंद्र सरकारने मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग या संस्थेला आयआयएम मुंबईचा दर्जा दिला. आयआयएम मुंबईत एमबीएचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यामध्ये एमबीए इन ऑफरेशन अॅन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, एमबीए इन सस्टेनिबिलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचा समावेश आहे तसेच एका वर्षाचे काही डिप्लोमा कोर्सेसही शिकविले जातात तसेच पी. एचडी. साठीही संस्थेत प्रवेश घेतात. 

सद्य:स्थितीत उच्चशिक्षणात मुलींचा टक्का हळूहळू वाढताना दिसत आहे. नामांकित शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेऊन स्वप्नांना गवसणी घालण्यात मुलीही अग्रेसर असल्याचे असून येत आहे.  व्यवस्थापनासंबंधीच्या या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मुलीही मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याचे दिसते. आयआयएम मुंबईमध्येही मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीमध्ये ३४१ विद्यार्थिनी एमबीएचे शिक्षण घेत आहेत. तर ४१ विद्यार्थिनी पीएच.डी. करत आहेत. हे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जवळपास ३५ टक्के एवढे आहे. मुलांच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे कमी असले तरी उच्च शिक्षणात मुलींचा टक्का वाढत असल्याचे यातून दिसते. मात्र, हे प्रमाण समपातळीला आणण्यासाठी आयआयएम मुंबईला प्रयत्न करावे लागणार आहेत.