साक्षरतेची व्याख्या बदलली; आता दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेलेही निरक्षरच !

‘उल्लास’ या साक्षरता अभियानांतर्गत साक्षर असण्याची व्याख्या बदलण्यात आली आहे. तसेच येत्या सहा वर्षांत भारत पूर्ण साक्षर करण्याचा विडा केंद्र शासनाने उचलला आहे.

साक्षरतेची व्याख्या बदलली; आता दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेलेही निरक्षरच !

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आता 15 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिक, ज्यांनी द्वितीय श्रेणीपर्यंत शिक्षण (Education upto Second Class) घेतले आहे, परंतु लिहिणे-वाचणे विसरले(Forgot to read and write) आहेत किंवा ज्यांना स्वतःची सही करता येत असेल(You can sign yourself) अशा व्यक्ती देखील निरक्षरच (Illiterate) मानले जाणार आहेत. ‘उल्लास’ या साक्षरता अभियानांतर्गत (Under the literacy campaign 'Ullas')  साक्षर (Literate) असण्याची व्याख्या बदलण्यात आली आहे. तसेच येत्या सहा वर्षांत भारत पूर्ण साक्षर (India fully literate) करण्याचा विडा केंद्र शासनाने (Central Govt) उचलला असून साक्षरतेचे मापदंड ही बदलण्यात आली आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव अर्चना शर्मा अवस्थी (Archana Sharma Awasthi, Joint Secretary, Ministry of Education) यांनी दिली आहे. 

आता फक्त सही कशी करायची हे जाणून घेणे पुरेसे नाही तर त्याऐवजी, हजारांपर्यंत मोजणे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारख्या कौशल्यांसह ओपन बोर्डाची 150 गुणांची पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यांकन (FLNET) चाचणी उत्तीर्ण करूनच कोणीही साक्षर होऊ शकतो. याशिवाय नोटांची ओळख आणि टेलिफोनचा वापर आदी माहिती देखील असणे आवश्यक असणार आहे. 

याविषयी बोलताना शर्मा म्हणाल्या, 2022 च्या सर्वेक्षण अहवालानुसार भारताचा साक्षरता दर 80.3 टक्के आहे. यामध्ये महिलांची साक्षरता 74.2 टक्के आणि पुरुषांची साक्षरता 86.2 टक्के आहे. ही दरी भरून काढण्यासाठी सातत्याने बदल होत आहेत. पूर्वी साक्षर असणे म्हणजे नावे लिहिणे किंवा वाचणे असे होते. मात्र आता केंद्र सरकारने संपूर्ण साक्षरतेचा मापदंड निश्चित केला आहे.

दरम्यान, NCERT ने 22 भारतीय भाषांमध्ये प्राइमर्स तयार केले आहेत, जेणेकरून ते त्यांच्या मातृभाषेत साक्षर होऊ शकतील. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलची (NIOS) FLNET ही तीन तासांची 150 गुणांची परीक्षा असेल. वाचन, लेखन आणि अंकांशी संबंधित 50-50 गुणांची लेखी परीक्षा होईल. साक्षर होण्यासाठी आता ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.