शिक्षक- शिक्षकेतर समायोजन थांबवा;मुख्याध्यापक महामंडळाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

सध्या बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यानंतर शालेय इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असणार आहेत. पेपर तपासणे, निकाल लावणे यासाठी एक मे 2026 उजाडणार आहे, तेव्हा सदर समायोजन प्रक्रिया थांबवावी ,अशा मागणी मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

शिक्षक- शिक्षकेतर समायोजन थांबवा;मुख्याध्यापक महामंडळाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील अतिरिक्त झालेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन (Adjustment of teaching and non-teaching staff) करण्यासाठी 4 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षण संचालक यांनी पत्रक काढून वेळापत्रक जाहीर केले. सध्या बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यानंतर शालेय इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीच्या परीक्षा (Examinations for grades 5 to 9 and 11) एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असणार आहेत. पेपर तपासणे, निकाल लावणे यासाठी एक मे 2026 उजाडणार आहे, तेव्हा सदर समायोजन प्रक्रिया थांबवावी (The adjustment process should be stopped) अशा मागणी मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने (Tanaji Mane) यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

डोंगराळ जिल्ह्यातील सेवकसंचासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी, त्यानुसार सुधारित सेवक संच करावा . अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन मे- जून महिन्यात करावे , अशा प्रकारचे निवेदन मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने शिक्षक आमदार आमि महामंडळाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले आहे. 

सध्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचा विचार करता सदर समायोजन संयुक्तिक होणार नाही. तसेच इयत्ता दहावी, बारावी परीक्षांचे केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक इत्यादी नियोजन झालेले असून या समायोजनामुळे परीक्षा घेणे व नियंत्रित करणे कठीण होणार आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया विस्कळीत होणार आहे. तसेच सन २५-२६ संच मान्यतेमध्ये राज्यातील ग्रामीण व डोंगरी भागातील अनेक शाळा शून्य शिक्षकी झालेल्या आहेत. 

समायोजनामुळे इयत्ता पाचवी ते नववी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि द्वितीय सत्र परीक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच काही शाळांच्या संचमान्यता जनरेट झालेल्या नाहीत. त्यामुळे डोंगरी भागातील सेवक संच निश्चितीचे विद्यार्थीसंख्येचे निकष शिथिल करावेत व त्यानुसार सुधारीत सेवकसंच झाल्यावर समायोजन प्रक्रिया मे-जून महिन्यामध्ये राबविण्यात यावी, अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळाकडून करण्यात आली आहे.