SPPU : अधिसभा बैठकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटना प्रतिनिधींनी विद्यार्थी प्रश्नांवर केली पोस्टरबाजी

विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांला वसतिगृह मिळाले पाहिजे. विद्यापीठ प्रशासनाने केलेली अतिरिक्त शुल्कवाढ तात्काळ रद्द करावी. Department of management science ( PUMBA ) MBA च्या प्रवेशात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी. विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे , आंदोलन , मोर्चा, उपोषण करणे विद्यार्थ्यांचा संविधानिक अधिकार आहे. तो कुणी हिरावून घेऊ नये, या प्रश्नावर विद्यार्थीनी पोस्टरबाजी केली

SPPU : अधिसभा बैठकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटना प्रतिनिधींनी विद्यार्थी प्रश्नांवर केली पोस्टरबाजी

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये (Savitribai Phule Pune University) आज दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी अधिसभा बैठक संपन्न (General Assembly meeting concluded) होत आहे. ही बैठक सुरू असताना २ ते ३ या दरम्यान विविध विभागांतील विद्यार्थी व संघटना प्रतिनिधींनी एकत्रित येऊन मुख्य इमारत परिसरात विद्यार्थी प्रश्नांवर शांततेत व संविधानिक पद्धतीने पोस्टरबाजी (Poster making in a constitutional manner) केली . यावेळी विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळांचे पंचनामे करा; शिक्षण संचालनालयाचे आदेश

विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांला वसतिगृह मिळाले पाहिजे. विद्यापीठ प्रशासनाने केलेली अतिरिक्त शुल्कवाढ तात्काळ रद्द करावी. Department of management science ( PUMBA ) MBA च्या प्रवेशात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी. विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे , आंदोलन , मोर्चा, उपोषण करणे विद्यार्थ्यांचा संविधानिक अधिकार आहे. तो कुणी हिरावून घेऊ नये, या प्रश्नावर विद्यार्थीनी पोस्टरबाजी केली.

विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे कार्यकारी व चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने आम्ही आमच्या मागणी सिनेट सदस्यांच्या पर्यंत पोहोचली. त्यानंतर अधिसभा सदस्य प्रा. हर्ष गायकवाड यांनी विद्यार्थी व संघटना प्रतिनिधीची गेटवर येऊन भेट घेतली. व विविध विद्यार्थी प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. व सभागृहात यावर आवाज उठविण्यासाठीचे आश्वासन दिले. विद्यापीठाच्या पदवीप्रदन समारंभात मंत्री महोदयांनी एक विधान केले आहे की, विद्यापीठाचे रँकिंग हे आंदोलन मोर्चा मुळे घसरले हे विधान पुर्णपणे तथ्यहीन आहे. विद्यापीठाचे रँकिंग करणारे आणि निकष ही वेगळीच आहेत. त्या मुख्य निकषांवर विद्यापीठ प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, असे मत विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडले. 
____________________________________________

अधिसभा सुरू असताना आम्ही सर्व विद्यार्थी व संघटना प्रतिनिधींनी एकत्रित येऊन मुख्य इमारत परिसराच्या बाहेर विद्यार्थी प्रश्नांवर पोस्टरबाजी केली आहे. विद्यार्थी प्रश्नांवर आवाज उठवणे, मोर्चा , आंदोलन , उपोषण करणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे. तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. रँकिंग घसरण्यामध्ये विद्यापीठ प्रशासन आणि विद्यापीठांमधील अकार्यक्षम अधिकारी जबाबदार आहे. आंदोलनामुळे रँकिंग घसरत नाही. आंदोलन मोर्चा मुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. यापुढील काळात आम्ही विद्यार्थी हित व विद्यापीठ हितासाठी लढत राहू.

- राहुल ससाणे अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती