अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

नोंदणी केलेल्या जवळपास १ लाख ७० हजार विद्यार्थी अद्याप महाविद्यालय मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. मागील ओपन टू ऑल फेरीमध्ये जवळपास ३७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक सत्र २०२५-२६ (Academic Session 2025-26) मधील इयत्ता ११ वी साठी अद्याप प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने (Directorate of Secondary and Higher Secondary Education) विशेष फेरीचे आयोजन केले असून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध (Special ferry schedule released) करण्यात आले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या फेरी वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना ६ आणि ७ सप्टेंबर रोजी विद्यार्थी अर्ज भाग- २ भरू शकतात. तसेच प्राध्यान्यक्रमाच्या यादीत किमान १ ते कमाल १० महाविद्यालयांचा समावेश करू शकतात. तर ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पोर्टलवर अलॉटमेंट लेटर जाहीर केले जातील आणि विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवले जाईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर (Director of Secondary and Higher Secondary Education Dr. Mahesh Palkar) यांनी दिली आहे.

पुणे विद्यापीठ : नवीन विषय किंवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. राज्यातील एकूण ९ हजार ५३५ कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता २१ लाख ५९ हजार २३२ इतकी आहे. एकूण नोंदणी केलेल्या १४ लाख ७९ हजार ६५४ विद्यार्थ्यांपैकी १३ लाख ४३ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचा भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) अंतिमतः सहभाग नोंदविला आहे. त्या विद्यार्थ्यांपैकी १३ लाख १२ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयात निश्चित केले आहेत.

पूर्णवेळ प्राध्यापक भरतीचा अध्यादेश, CHB मानधन; प्राध्यापक संघटना येणार रस्त्यावर

नोंदणी केलेल्या जवळपास १ लाख ७० हजार विद्यार्थी अद्याप महाविद्यालय मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. मागील ओपन टू ऑल फेरीमध्ये जवळपास ३७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.

वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशासाठी नवीन नोंदणी तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण (एटीकेटी) विद्यार्थ्यांना भाग १ मध्ये दुरूस्ती करता येणार आहे. तसेच प्रवेश रद्द करता येईल. तर ६ आणि ७ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भाग-२ भरता येईल, तसेच प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान १ ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवता येईल. या फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोटा प्रवेशासाठी पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवून लाॅक करता येणार आहे.