अकरावीचे 6 लाख 18 हजार विद्यार्थी कॉलेजबाहेर; तरीही वर्ग सुरू होणार

तिसऱ्या फेरी अखेरीस 8 लाख 13 हजार 727 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. तिसऱ्या फिरतून एकूण 93 हजार 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

अकरावीचे 6 लाख 18 हजार विद्यार्थी कॉलेजबाहेर; तरीही वर्ग सुरू होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (State Department of School Education)इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया (Online process for admission to class XI)राबवली जात असून तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील 8 लाख 13 हजार 727 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला आहे.मात्र,अजूनही 6 लाख 18 हजार 927 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत (6 lakh 18 thousand 927 students are waiting for admission)आहेत. परंतु, त्यापूर्वीच येत्या ११ ऑगस्टपासून इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थी वर्गाबाहेर असताना शिकवणार कोणाला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे 9 हजार 522 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 43 हजार 610 जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र राज्यातील केवळ 14 लाख 32 हजार 654 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी आत्तापर्यंत कॅप राऊंड अंतर्गत 6 लाख 73 हजार 371 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अल्पसंख्यांक कोटा, इन हाऊस कोटा आणि व्यवस्थापन कोटा अंतर्गत 1 लाख 38 हजार 360 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतु, तिसऱ्या फेरी अखेरीस 8 लाख 13 हजार 727 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. तिसऱ्या फिरतून एकूण 93 हजार 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे 19 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार 11 ऑगस्ट किंवा त्यापूर्वीपासून इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करणे अनिवार्य आहे. त्यामुळे 11 ऑगस्ट पासून किंवा त्यापूर्वी सर्व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्या बाबतची खातरजमा करावी. तसेच आपल्या विभागात किती महाविद्यालय सुरू झालेली आहेत.या संदर्भातील अहवाल शिक्षण विभागाकडे सादर करावा, अशा सूचना डॉ महेश पालकर यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, शिक्षण विभागाने चौथ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही. पहिल्या फेरी दरम्यान भरलेल्या अर्जा भाग एक मध्ये ज्यांना दुरुस्ती करावयाची आहे, तसेच प्रवेशाचा भाग एक व भाग दोन भरावयाचा आहेत.तसेच पसंतीक्रम नोंदवायचे आहेत. त्यांना चौथ्या फेरीसाठी 28 ते 29 जुलै दरम्यान अर्ज करता येईल. तसेच सर्व प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक व दोन लॉक करावा लागणार आहे.