सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

या निर्णयाने 70 हजार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे सांगितलं जात आहे. एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना वर्षाला 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळते. चार वर्षांसाठी मंजूर झालेली शिष्यवृत्ती अचानक बंद झाल्याने मराठा तरुणांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मध्येच बंद करता येणार नाही, अन्यथा मराठा समाजाचा हिसका दाखवू, असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांनी दिला आहे.

सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सारथी संस्थेमार्फत (Sarathi Institute Scholarship) आठवीमध्ये NMMS परीक्षेमध्ये (8th NMMS Exam) उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती सरकारकडून अचानक बंद (Scholarship suddenly closed) करण्यात आल्याने मराठा महासंघाने कडाडून विरोध करण्यात आला आहे. महिन्याला नऊशे रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले जात होते. चार वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळत होती. मात्र, ही शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठा समजातील आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. 

'प्राध्यापक भरती'मुळे पुणे विद्यापीठाची दुर्दशा; रँकिंग घसरले, कुलगुरूंना दोषी ठरवले..

या निर्णयाने 70 हजार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे सांगितलं जात आहे. एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना वर्षाला 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळते. चार वर्षांसाठी मंजूर झालेली शिष्यवृत्ती अचानक बंद झाल्याने मराठा तरुणांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मध्येच बंद करता येणार नाही, अन्यथा मराठा समाजाचा हिसका दाखवू, असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने अचानक सारथीकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला असून 70 हजारांपेक्षा जास्त मराठा विद्यार्थी वंचित राहणार आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 17 हजार विद्यार्थी लाभार्थी आहेत. सारथी संस्थेमार्फत इयत्ता 8 वी मध्ये एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण मराठा विद्यार्थ्यांना मासिक 900 रुपये शिष्यवृत्ती 4 वर्षांसाठी दिली जात होती. परंतु मध्येच शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मराठा समजातील विद्यार्थ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने कार्यरत सारथीला त्यांच्या विचारांच्या कार्याचा या सरकाला विसर पडला आहे. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत केले होते. तसेच दीन दलितांना शिष्यवृत्ती दिल्या होत्या. शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा जपत सारची संस्थेने शैक्षणिक उन्नतीसाठी काम करणे अपेक्षित असताना संचालक मंडळाने मध्येच शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या विचारला तिलांजली दिली असल्याचे मत वसंत मुळीक यांनी व्यक्त केले आहे.