रोखून ठेवलेल्या होमिओपॅथीच्या 'त्या' विद्यार्थांचे अखेर निकाल जाहीर
विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांचे निकाल तत्काळ त्यांना दिले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे होते. मात्र यादरम्यान विद्यापीठाने हे निकाल जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
काही तांत्रिक कारणामुळे होमिओपॅथीचे शिक्षण (teaching of homeopathy) घेणार्या ५९० विद्यार्थ्यांचे निकाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (Maharashtra University of Health Sciences) राखून ठेवले होते. यातील काही विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांचे निकाल तत्काळ त्यांना दिले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडूनच (Controller of School Examinations) स्पष्ट करण्यात आले आहे होते. मात्र, या दरम्यान विद्यापीठाने हे निकाल जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील होमिओपॅथी महाविद्यालयांच्या अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे राखून ठेवलेल्या होमिओपॅथीच्या ५९० विद्यार्थ्यांचे निकाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केले असून, आता कोणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १४ सप्टेंबर रोजी यासंदर्भात लेखी माहिती दिली होती. उन्हाळी परीक्षा - २०२४ या वर्षातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले होते.
प्रवेश पात्रता नसणे, न्याय प्रविष्ट प्रकरणे, नीट पर्सटाइल कमी असताना प्रवेश देणे, तात्पुरती पात्रता दिलेली असणे, नंतर आवश्यक पूर्तता न करणे, परीक्षेत गैरप्रकार करणे, मूळ परीक्षा अर्ज सादर न करताच परीक्षेला बसणे, मागील परीक्षेचा निकाल प्रलंबित असताना उन्हाळी सत्र २०२४ परीक्षेस प्रविष्ट होणे यासारख्या कारणांमुळे हे निकाल राखून ठेवण्यात आले होते.