४ थी पास उमेदवारांना नोकरीची संधी, कृषी विद्यापीठात ३८१ पदांसाठी भरती सुरू

या भरती मोहिमेअंतर्गत मजूर पदांच्या ३०७ तर पहारेकरी पदांच्या ६२ जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना १ ऑगस्टपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. मजूर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ४ पास असणे आवश्यक आहे. तर पहारेकरी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे ७ पास शिक्षण असणे आवश्यक आहे.

४ थी पास उमेदवारांना नोकरीची संधी, कृषी विद्यापीठात ३८१ पदांसाठी भरती सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या ४ थी पास शिक्षण (4th Pass Education)असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (Vasantrao Naik Marathwada Agricultural University Parbhani) अंतर्गत “गट क व गट ड” पदांच्या एकूण ३८१ रिक्त जागा (381 vacancies) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२५ (Deadline August 1 2025) आहे.

या भरती मोहिमेअंतर्गत मजूर पदांच्या ३०७ तर पहारेकरी पदांच्या ६२ जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना १ ऑगस्टपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. मजूर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ४ पास असणे आवश्यक आहे. तर पहारेकरी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे ७ पास शिक्षण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी परीक्षा पद्धत वापरली जाणार आहे. त्यानुसार ६० गुणांची व्यावसायिक चाचणी व ४० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे.

TCS आणि IBPS मार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षा ३ महिन्यांत MPSC कडे वर्ग करा..

या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे. भरती नियमानुसार राखीव संवर्गातील उमेदवारांना सुट देण्यात येणार आहे. भरतीचा अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १ हजार रुपये परीक्षा शुल्क आकरण्यात आलेला आहे. तर मागाव प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ उमेदवारांना ९०० रुपये एवढा परीक्षा शुल्क आहे. अधिक आणि सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.vnmkv.ac.in ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.