आरटीईच्या 6000 जागांसाठी 7 तर 12000 जागांसाठी 80 अर्ज ; 15 जिल्ह्यात अर्जांची संख्या 500 च्या आत 

राज्यातील 15 जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 500 च्या आत  आहे.

आरटीईच्या 6000 जागांसाठी 7 तर 12000 जागांसाठी 80 अर्ज ; 15 जिल्ह्यात अर्जांची संख्या 500 च्या आत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right to education-RTE) राबवल्या जात असलेल्याऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg district) आरटीईच्या 6 हजार 93 जागांसाठी 7 अर्ज तर गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli district) 12 हजार 685 जागांसाठी 80 अर्ज आले आहेत.तर राज्यातील 15 जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 500 च्या आत आहे.तसेच केवळ 10 जिल्ह्यात ही संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.यावरून यंदा महाराष्ट्रातील (Maharashtra)आरटीई प्रवेश प्रक्रियेला (rte admission process) मिळालेल्या प्रतिसाचे चित्र स्पष्ट होते. तसेच पालकांना सरकारी शाळेत (government school)आपल्या मुलांना शिक्षण नको तर खासगी शाळेत (private school) शिक्षण हवे असल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखित होते.

हेही वाचा : लॉटरीशिवाय मिळणार आरटीईतून प्रवेश? काय आहे कारण...

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाली असून प्रवेश अर्ज भरण्याचा मंगळवारी (दि.30) शेवटचा दिवस आहे. कदाचित शिक्षण विभागाकडून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते.मात्र, बदललेल्या नियमावलीनुसार आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास पालक इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, उस्मानाबाद , बीड, जळगाव हे जिल्हे वगळता एकाही जिल्ह्यात एका हजारापेक्षा अधिक अर्ज आले नाहीत.त्यातही या जिल्ह्यातील उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त झालेले अर्ज अत्यल्प आहेत.त्यामुळे यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया पालकांना रुचली नाही,असे स्पष्ट होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या नियमावलीत बदल केल्यामुळे आणि राज्य शासनाने आरटीई कायद्याच बदलल्याने यंदा हजारो विद्यार्थी आरटीई प्रवेशाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकणार नाहीत. त्यामुळेच काही वकील व संघटनांनी एकत्र येऊन याबाबत न्यायालतात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सुद्धा राज्य शासनाला येत्या 8 मेपर्यंत याबाबत खुलासा सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे राज्य शासन काय उत्तर सादर करणार याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे. 

-----------
 जिल्हा      उपलब्ध जागा   प्राप्त अर्ज 
सिंधुदुर्ग         6,093         07 
गडचिरोली    12,685         80 
रत्नागिरी        11,461       116 
नंदुरबार         20,568      140 
हिंगोली          14,456      180 
वाशिम           13,098      254 
परभणी           21,529     258 
पालघर           30,513     274
सांगली           26,343     292 
भंडारा            11,985     327 
उस्मानाबाद     13,783     332 
अकोला           13,484    438
कोल्हापूर        22,033     445 
गोंदिया            14,338    462 
वर्धा                 9,452      458 
धुळे               21,266     509
रायगड            21,621    529