धक्कादायक! दहावीचे पेपर सुरू असताना मुख्याध्यापकाकडून शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोर मारहाण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आजपासून संपूर्ण राज्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, यावेळी नागपूरच्या किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे असलेल्या परीक्षा केंद्रावरून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना समोर आली.

धक्कादायक! दहावीचे पेपर सुरू असताना मुख्याध्यापकाकडून शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोर मारहाण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary Education) आजपासून संपूर्ण राज्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, यावेळी नागपूरच्या किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज (Kidwai High School and Junior College) येथे असलेल्या परीक्षा केंद्रावरून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना समोर आली. दहावीचे पेपर सुरू असताना मुख्याध्यापक कक्षात मुख्याध्यापक सगीर अहमद यांच्याकडून शिक्षक माजीद खान पठाण यांना मारहाण (Teacher beaten by principal) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षक सगीर अहमद यांच्या डोक्याला मार (Teacher Sagir Ahmed hit on the head) लागला असून ते जखमी झाले. त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नागपुरातील किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवारी उपस्थिती नोंदविण्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. सगीर अहमद यांनी मुख्याध्यापक आणि एका अन्य शिक्षकाने मिळून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या बंधूंसह काही सहकाऱ्यांनीही शाळा प्रशासनावर गंभीर आरोप करत निषेध व्यक्त केला.

दुसरीकडे, मुख्याध्यापकांनी घटनेबाबत वेगळी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सगीर अहमद यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रावर नेमण्यात आले होते. मात्र ते त्या केंद्रावर न जाता शाळेत आले आणि मस्टरवर स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला. नियमानुसार त्यांना थांबवण्यात आले असता त्यांनीच वाद निर्माण केला. गोंधळाच्या परिस्थितीत ते खाली पडले व जखमी झाल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे. शिक्षकांच्या कथित नियुक्तीप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून त्यावरूनच काही जण शाळेची बदनामी करत असल्याचे म्हणत मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. 

घटनेनंतर काही काळ परीक्षा केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. परीक्षा सुरू असल्याने प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे चौकशीअंती सत्य परिस्थिती बाहेर येणार आहे. परीक्षेच्या काळात शाळेतच घडलेल्या या प्रकारामुळे पालक आणि शैक्षणिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण समोर येणार आहे.