वार्षिक परीक्षांच्या वेळापत्रकामुळे बिघडले गावी जाण्याचे नियोजन
वार्षिक परीक्षा संपल्या की, पालक गावी जाण्याचे नियोजन करतात. त्यासाठी दोन-तीन महिने आधीच बुकिंग केले जाते मात्र, यंदा ज्या पालकांनी गावी जाण्यासाठी प्रवासाचे बुकिंग केले आहे त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात इयत्ता पहिली ते नववीच्या वर्गातील वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्याचा निर्णय (Decision to conduct annual exams simultaneously) घेण्यात आला असून पहिली ते नववीच्या वर्गाची वार्षिक परीक्षा (Annual Examination) ८ एप्रिलपासून सुरू होऊन 25 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. यापूर्वी साधारण १५ एपिलपर्यंत वार्षिक परीक्षा संपुष्टात यायच्या मात्र, आता या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत (Until the end of April) चालणार आहे. याचा परिणाम थेट पालकांच्या गावी जाण्याच्या नियोजनावर पडणार आल्याचे चित्र आहे.
वार्षिक परीक्षा संपल्या की, पालक गावी जाण्याचे नियोजन करतात. त्यासाठी दोन-तीन महिने आधीच बुकिंग केले जाते. मात्र, यंदा ज्या पालकांनी गावी जाण्यासाठी प्रवासाचे बुकिंग केले आहे. त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण, काल दि. ५ मार्च रोजी राज्य शासनाकडून वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या परीक्षा एप्रिल अखेरीस संपणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून अशा पद्धतीचा तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आम्ही गावी जाण्याचे नियोजन केले आहे. आता त्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु राहतील. त्यामुळे आमचे गावी जाण्याचे नियोजन बिघडले आहे, असे अनेक प्रश्न पालकांमध्ये उपस्थित झाले आहेत.