प्राध्यापक भरतीवर महिन्याभरात मार्ग; NIRF रँकिंग कमी होण्यास परसेप्शन कारण: चंद्रकांत पाटील

विद्यापीठाचे रँकिंग कमी होण्यास परसेप्शन हे सुध्दा एक कारण आहे. आंदोलनाच्या मी विरोधात नाही. मात्र, विद्यापीठातील आंदोलनचे स्वरूप कसे असले पाहिजे. काही प्रश्न समन्वयाने सोडवले पाहिजे. काही प्रश्न सुटत नसतील तर शासन स्थरावर आम्ही सोडवण्यासाठी बसलो आहोत.

प्राध्यापक भरतीवर महिन्याभरात मार्ग; NIRF रँकिंग कमी होण्यास परसेप्शन कारण: चंद्रकांत पाटील

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील(Savitribai Phule Pune University) प्राध्यापक भरतीची प्रक्रिया (Faculty Recruitment Process)सुरू होऊन सुमारे दीड वर्ष झाले तरीही विद्यापीठातील 111 पदे भरली गेली नाहीत.त्यात राज्य शासनाच्या काही आर्थिक अडचणी आहेत तर काही नियमांमधील अडचणी आहेत. महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीसाठी राज्याच्या आर्थिक अडचणी आहेत. परंतु, येत्या महिन्याभरात हे सर्व प्रश्न मार्गी लागतील. तसेच केवळ प्राध्यापकांची अपुरी संख्या हे विद्यापीठगाचे एनआयआरएफ रॅकिंग (NIRF Rancking)कमी होण्याचे एकमेव कारण नाही तर परसेप्शन हे देखील एक कारण आहे. त्यामुळे विद्यापीठात सातत्याने होणारी आंदोलने होऊ नयेत,यासाठी विद्यापीठाने त्यातून समन्वयाने व चर्चा करून मार्ग काढावेत,असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil)यांनी सोमवारी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 126 व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता व इतर अधिकार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुढे गेले पण देशातील एनआयआरएफ क्रमावारीत मागे आले.कारण क्रमवारी निश्चित करण्याचे निकष हे वेगवेगळे आहेत.समाज माध्यमांकडून वाढलेल्या रॅकिंगचे कौतुक करताना कंजूसपणा केला गेला.परंतु, रॅकिंग कमी झाल्याने त्यांची कारणे दूर्बिन लावून शोधली जातात . पण निंदकाचे घर असावे शेजारी, असे याकडे पाहिले पाहिजे. विद्यापीठाचे रॅकिंग कमी होण्यास परसेप्शन हे सुध्दा एक कारण आहे. आंदोलनाच्या मी विरोधात नाही. मात्र, विद्यापीठातील आंदोलनचे स्वरूप कसे असले पाहिजे. काही प्रश्न समन्वयाने सोडवले पाहिजे. काही प्रश्न सुटत नसतील तर शासन स्थरावर आम्ही सोडवण्यासाठी बसलो आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज हे राजेतेचे राजे होते. रायतेच्या मनात काय आहे,हे शिवाजी महाराज यांना कळत होते.त्यामुळे त्यांच्या काळात आंदोलने झाली नाहीत. तसे विद्यापीठालाही रायतेच्या मनातील काळले पाहिजे. पण रायतेला सुध्दा कळले पाहिजे. एखाद्या विषयावर किती अग्रेसिव्ह व्हावे.एखाद्या मूद्यांचे सोशल मीडिया परसेप्शन काय होते.त्याचे जगभर देशभर काय परसेप्शन जाते. हे सुध्दा समजून घेतले पाहिजे.आपल्या घरात भांडण झाले तर आपण बाहेर जाऊन सांगत नाही तर चर्चा करून सोडवतो. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.तसेच विद्यापीठात प्रयोगशाळा व पुस्तके खरेदीसाठी सीएसआरचा वापर करावा, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या.