रोजगारासाठी 50 टक्के तरुणच पात्र; कौशल्य शिक्षणाची कमतरता

आर्थिक सर्वेक्षण 2024 च्या  अंदाजानुसार केवळ 51.25 टक्के तरुणांना रोजगारासाठी पात्र मानले गेले आहे.

रोजगारासाठी 50 टक्के तरुणच पात्र; कौशल्य शिक्षणाची कमतरता
employment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतातील वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शालेय आणि पदवी शिक्षणासाठी (SCHOOL AND GRADUATE EDUCATION) विविध योजना राबवल्या जात आहेत,असे असले तरीही अनेक तरूणांकडे आधुनिक काळासाठी अनुसरून आवश्यक कौशल्ये (Skills needed to adapt to modern times)नाहीत.आर्थिक सर्वेक्षण 2024 च्या  अंदाजानुसार केवळ 51.25 टक्के तरुणांना रोजगारासाठी पात्र (eligible for employment)मानले गेले आहे.

महाविद्यालयातून पदवी घेऊनही दोनपैकी एका विद्यार्थ्याला नोकरी मिळते. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या दशकाच्या तुलनेत  ही टक्केवारी 34 टक्क्यांवरून 51.3 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या सहा वर्षांत भारतीय श्रमिक बाजार निर्देशक सुधारले आहेत. ज्यामुळे 2022-23 मध्ये बेरोजगारीचा दर 3.2 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. 

EPFO अंतर्गत निव्वळ वेतन वाढ गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाली आहे. जे औपचारिक रोजगारातील निरोगी वाढ दर्शवते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्थिक गतिविधिचे प्रमाण आपल्या देशात वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात आपल्या देशातील युवकांचा कौशल्य विकास होणे आवश्यक आहे. 
भारतात सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी सर्वाधिक आहे.आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) अहवालात असे दिसून आले आहे की  दोन दशकांत बेरोजगारांमधील सुशिक्षितांचा वाटा जवळपास दुप्पट झाला आहे. ILO अहवालनुसार सन 2000 मध्ये बेरोजगारांमध्ये सुशिक्षित लोकांचा वाटा 35.2% होता. जो 2022 पर्यंत 65.7% पर्यंत वाढला आहे.