आता दहावीनंतर होता येणार डॉक्टर, साडेसात वर्षाचा अभ्यासक्रम 

हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) एमबीबीएसची जागा मिळाली नाही, तर आयुर्वेद किंवा इतर भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीच्या अभ्यासाकडे जाणाऱ्यांची संख्या कर्नाटक सारख्या राज्यामध्ये वाढत चालली आहे. 

आता दहावीनंतर होता येणार डॉक्टर, साडेसात वर्षाचा अभ्यासक्रम 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉक्टर होण्याची स्वप्न पहाणार्‍या तरूणांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारण आता विद्यार्थ्यांना १० वीचे शिक्षण पूर्ण झाले की, लगेच डॉक्टर होता येणार आहे.  आयुर्वेदिक डॉक्टर (Ayurvedic doctor) बनण्याचा मार्ग सुकर झाला असून, १० वी नंतर विद्यार्थी  BAMS डॉक्टर (BAMS Doctor after 10th standard) बनू शकतात. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) एमबीबीएसची जागा मिळाली नाही, तर आयुर्वेद किंवा इतर भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीच्या अभ्यासाकडे जाणाऱ्यांची संख्या कर्नाटक सारख्या राज्यामध्ये वाढत चालली आहे. 

भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने दहावीनंतर थेट पदवी प्रवेशाची संधी दिली आहे. याबाबत गतवर्षी नियम तयार करून त्याबाबत आक्षेप मागवले होते. त्यावर दाखल केलेल्या आक्षेप, सल्ला, सूचनांचा विचार करुन नियमांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘प्री-आयुर्वेद प्रोग्रॅम फॉर आयुर्वेद मेडिसीन अँड सर्जरी रेग्युलेशन्स २०२४’ असे या नियमावलीचे नामकरण करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. 

साडेसात वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ही पदवी मिळेल. पहिली दोन वर्षे प्री आयुर्वेद प्रोग्रॅम (पीएपी) असेल. साडेचार वर्षे बीएएमएस पदवी अभ्यासक्रम असणार आहे. त्यानंतर एका वर्षासाठी सक्तीचे इटर्नशीप असेल. परीक्षा देण्यासाठी ७५ टक्के हजेरीची सक्ती  विद्यार्थ्यांना असून प्रत्येक विषयांच्या तासिकेत देखील ७५ टक्के हजेरीची सक्ती असणार आहे. प्रायोगिक हजेरीसाठीही हाच नियम असेल. यासाठी वर्षाच्या अखेरीस वार्षिक परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुणांची सक्ती असणार आहे. भारतीय वैद्य पद्धत अंतर्गत आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपथी पदवी अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ प्रवेश घ्यावा लागतो. आयुर्वेद पूर्व अभ्यासक्रमासाठी नीट-पीएपी द्यावी लागते. याकरिता ठराविक गुणांची अट लागू करण्यात आली आहे.