NCERT चा निर्णय: ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतरच मिळतील नवीन पुस्तके

विद्यार्थ्यांना  पुढील वर्गात जाण्यासाठी तयार करणे हा या ब्रिज कोर्स आयोजित करण्याचा उद्देश आहे. ब्रिज कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्याला नवीन पुस्तकातील माजकूराची ओळख करून दिली जाईल. नवीन पुस्तकांमध्ये उपक्रमांवर जास्त भर देण्यात आला असून त्या सर्व उपक्रमांची माहिती ब्रिज कोर्समध्ये देण्यात आली आहे.

NCERT चा  निर्णय: ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतरच मिळतील नवीन पुस्तके

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन सत्रात इयत्ता 5 वी आणि 8 वी (Class 5th and 8th)मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नवीन पुस्तके हवी असतील तर त्यांना आधी ब्रिज कोर्स (Bridge Course)पूर्ण करावा लागणार आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने आता या दोन्ही वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी एक ब्रिज कोर्स तयार केला आहे, जो फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस अपलोड केला जाईल. हा कोर्स पूर्ण करणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. 
 एनसीईआरटीचे संचालक प्रोफेसर दिनेश प्रसाद सकलानी यांनी संगितले, "इयत्ता 5वी साठी 30 दिवसांचा ब्रिज कोर्स तयार करण्यात आला आहे. तर  आठवीसाठी 45 दिवसांचा कोर्स असेल. नव्या सत्रात 5वी आणि 8वीच्या वर्गात येणाऱ्या मुलांनी जुन्या अभ्यासक्रमानुसार व पॅटर्ननुसार अभ्यास केला असेल, अशा स्थितीत जुन्या पॅटर्नमधून नव्या पॅटर्नकडे जाण्यास मुलांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा ब्रिज कोर्स बनवण्यात आला आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन (NCF-SE) च्या आधारे तयार केलेली नवीन पुस्तके ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतर दिली जातील. 
विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी तयार करणे हा ब्रिज कोर्स आयोजित करण्याचा उद्देश आहे. ब्रिज कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्याला नवीन पुस्तकातील मजकुराची ओळख करून दिली जाईल. नवीन पुस्तकांमध्ये उपक्रमांवर जास्त भर देण्यात आला असून त्या सर्व उपक्रमांची माहिती ब्रिज कोर्समध्ये देण्यात आली आहे. ब्रिज कोर्समध्ये शिकवण्याचे नवीन पॅटर्नही समजावून सांगितले जाणार आहे. 

NCERT च्या  नवीन पुस्तकांमधील मजकूर कमी करण्यात आला असून अॅक्टीविटी वर अधिक भर देण्यात आला आहे. पुस्तकातील सादरीकरण विद्यार्थ्यांना विषय सहज समजेल असे आहे. मुलांना खेळाच्या माध्यमातून शिकवण्यावर भर देण्यात आला आहे. आनंददायी शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती सकलानी यांनी दिली.