NCERT च्या पाठ्यपुस्तकांत मोठा बदल; 'बेटी बचाओ' सारख्या सरकारी उपक्रमांना स्थान
शालेय शिक्षणामध्ये भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान, ज्ञान व्यवस्था आणि स्थानिक संदर्भांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एनसीईआरटीच्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये (NCERT) मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुघल आणि दिल्ली सल्तनत (Mughals and Delhi Sultanate) यांचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत. भारतीय राजघराणे, महाकुंभचे संदर्भ, 'मेक इन इंडिया' आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' (Indian royal family, references to Mahakumbh, 'Make in India' and 'Beti Bachao, Beti Padhao') सारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. ही नवी पुस्तके या आठवड्यात प्रकाशित करण्यात आली आहेत.
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफएसई) २०२३च्या अनुषंगाने ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, शालेय शिक्षणामध्ये भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान, ज्ञान व्यवस्था आणि स्थानिक संदर्भांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन या प्राचीन भारतीय राजघराण्यांवरील नवीन अध्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याबरोबरच हिंदू धर्मासह इस्लाम, ख्रिाश्चन धर्म, यहुदी धर्म आणि झोरोस्ट्रियन धर्म, बौद्ध धर्म आणि शीख धर्म यांच्यासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या जागा आणि तीर्थक्षेत्रांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यासाठी जवाहरलाल नेहरू यांच्या अवतरणाचा संदर्भ देण्यात आला आहे.